Monday, 29 September 2025

९ स्त्रीयांमधील स्त्री तत्वांचा अनुभव आणि आभार

स्त्री तत्वाचा जागर, 
नवरात्र निमित्त आभार व्यक्त करण्यासाठी.

वर्षभर मी परमेश्वर कृपेने काही ना काही विविध विषयांवर वाचत आलेय, त्यातुन हे सुचल. मनापासून वाटलं की या शारदीय नवरात्रात आपण आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या खंबीर स्त्रीया आठवु विचार करू पाहुन. ज्यांना बघुन मला नेहमीच कौतुक वाटत आदर वाटत आलाय.

गेल्या २५-३० वर्षात पाहण्यात आलेल्या अशा ९ स्त्रीयांना नोंद करून त्यांच्यातील स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार मानु. काही ना काही कारणान मी काही ना काही या प्रत्येकी कडून शिकत आलेय. नकळत नोंद होत जाते. काही छान पाहिल की ते जस जमेल तस आपण जीवनात ऊतरवतो सुद्धा ते पण नकळत बरका!  सगळ्यांच असच असत, माझ फार काही वेगळ नाही.

मागच्या वर्षी पण असा एक उपक्रम मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता ईतर मैत्रिणींना पण सहभागी करत केला होता. यंदा मी माझ्या आयुष्यात आलेल्या २५-३० वर्षातल्या ९ जणींना आठवुन त्यांच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानायच ठरवलं, म्हणून हा प्रपंच.

खर तर हे अवघड आहे कारण अशा अनेक कर्तृत्ववान 'स्त्री' शक्तीचा मला अनुभव आलेला आहे. तरी एक प्रयत्न करतेय त्यातल्या ९ समोर मांडण्याचा.

ॐ जगदंबा माता की जय ॐ
१) पंपावरची ताई : २२ सप्टेंबर २०२५
आज जवळजवळ २०-२२ वर्ष ऑफिसला जाताना पेट्रोल भरतानाची आमची ओळख. ओळख म्हणजे ती काय तर त्या हसणार मी मी हसणार, काय म्हणता? ईतकीच. ईतकी वर्ष सलग मी त्यांना मन लावून पंपावर काम करतात बघत आलेय. मला नेहमी वाटायच की  एवढाले तास सतत ऊभ राहून धुळीत काम करण तस कष्टाचच.  रोजच्या जीवनात हे काम करताना किती जुळवून जगाव लागत असेल ना यांना. पण या सगळ्यात असुनही सदा आनंदीच  बघत आलेय मी यांना. संयमान सहकार्यान समोरच्याशी हसुन या काम करताना दिसतात. 
आज खुप दिवसांनी आलात ?
पंप बदलला की काय?
अरे व्वा! नवीन गाडी मस्त. 
अरेच्चा! आज ऊशिरा कशा काय तुम्ही?
असे आमचे संवाद आणि ईतकाच संवाद. 
माणसान फक्तं हसुन दखल घेतली तरी ती दूर दूर संबंध नसला तरी आपली वाटतात. अशा या पंपावरच्या ताईंना मी परवा मी फोटो मागितला आणि पळतच निघत म्हटल नुसत की काहीतरी लिहायचय मला झाल की दाखवते. गोड हसत बरं बरं म्हणत विश्वासान तो त्यांनी काढु दिला. मी त्यांची आभारी आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला मी त्यांच्यातील स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते.
२) रेखा काकु सातपुते. २३ सप्टेंबर २०२५
मटार करंजी म्हटल की रेखा काकुच बाकी सगळे गौण, हा माझाच नाही तर आमच्या घरच्यांचा, आप्तेष्टांचा मित्र मंडळींचा विचार. खर सांगायच तर रेखा काकुना मी लग्नाच्या आधीपासून ओळखते. गोऱ्यापान, मोठ्ठ कुंकु नीटनेटकी मस्त साडी. त्यांना सतत स्वयंपाकघरात ऊत्तम पदार्थ करताना पाहून वाटायच एवढ काम करून चेहऱ्यावर दमल्याचा मागमूसही नसतो. त्या वयात याचं आश्चर्य ही वाटायचं.
रेखा काकुंनी कष्टानी लावलेलं सकाळच नाश्ता सेंटर, जे आम्ही सकाळी बरेचदा जाऊन चट्टा मट्टा करतो ते आज वटवृक्ष झालय. यंदाच २५ व वर्ष. अन्नपूर्णा रेखाकाकुनी कष्टानं हे तर ऊभ केलच पण माणसं पण खुप छान जोडली. या सेंटरच्या कामात लेकाचा पण काही वर्षांपासून सहभाग असतो. त्यांच मुलं सुना नातवंडांनी भरल घर बघुन आणखी छान वाटतं.
माणस जोडणं ही कला या पिढीलाच जास्त छान जमते जी आपण आत्मसात केली पाहिजे अस मला नेहमी वाटतं. काकूंचा मटार करंजी वर्क शॉप जो घरात चालतो तो मी पाहिलाय, एकदम पद्धतशीर आणि स्वच्छतेच काटेकोर पालन करत. काकु घरचं मुलांच पाहात हे सगळ करत ईथवर आल्याच मी जेव्हा पाहते तेव्हा कौतुक तर वाटतच पण आदरही वाटतो. त्या पिढीतील अशा सगळ्याच बायकांना मानलच पाहिजे. या नवरात्रात दुसऱ्या माळेला मी रेखा काकु मधल्या स्त्री तत्वांचे कौतुक करते आणि आभार मानते. 

३) वैशाली महाजन. २४ सप्टेंबर २०२५
आजुबाजुच्या सुंदरींना आणखी सुंदर ठेवणारी ही पार्लर चालवणारी वैशाली. राहणीमान एकदम टापटीप आणि माझ्यासारखी फोटो वेडी.
वैशाली ला मी २२-२३ वर्ष ओळखतेय. माझं सुंदर तजेल दिसणार व्यक्तीमत्व निखरण यात हीचा मोलाचा हात. आम्ही समवयस्क आणि समसुखी सुद्धा!  मला कायम तीच कौतुक वाटतं कारण लहानशा गावातुन शिकुन लग्न होऊन ही पुण्यात आली. गावातुन सौंदर्य प्रसाधन वापरून निखरून टाकण्याची कला घेऊन आलेली अशी ही. पुण्यात येऊन एकत्र कुटुंब सावरत स्वःताला या कलेत सिद्ध करत आज ती आमच्या आजूबाजूला फेमस झालीय. प्रत्येक ग्राहकाला योग्य सल्ला व वागणुक देणं, आलेल्या सगळ्याच स्त्रीयांना सुंदर करून सोडण आणि ते पण स्मितहास्यानी. वैशालीनी छान दिसतेय म्हटल की सगळ्या हूश्श करतात.
तुझे कामाचे पैसे वेगळे साठव हे सांगत खुप वर्षांपुर्वी मी तीला कॅश बाॅक्स दिलेला आज आठवला. मी हक्कानं दिलेला आणि तीनी प्रेमानं घेतलेला. खरतर तो घेणं तीला जड नव्हतं पण मला नको म्हटली नव्हती. ते मला आवडलं होतं. आधी एका कोपऱ्यात पार्लर होत, मग फेशिअल ची सोय झाली मग ईतरही सोई एकाच ठिकाणी केल्या हा तीचा बढतीचा चढताक्रम. कौतुकाचाच आहे कारण लहानशा गावातुन शिकुन पुण्या सारख्या शहरात बस्तान बसवणं सोप नाही. कितीही ढिगभर फाॅल पिकोला असु दे ही कायम हसतमुख बागडणारी आनंदी तसेच वेळेला खंबीर व्यक्ती म्हणून मी आज तिसऱ्या माळेला हीच्यातल्या स्त्री तत्वाच कौतुक करते आणि आभार मानते.

४) गौरी वाघमारे. २५ सप्टेंबर २०२५
जेव्हा आपल्याला एखाद्याच काम आवडत, ते करण्याची पद्धत आवडते तेव्हा आपल्याला छान वाटतं. यात काम कोणत याचा विचार नाही ते कस करताना दिसतय हे महत्त्वाचं अस माझ म्हणण आहे. आज चौथ्या माळेला मी माझ्या पाहण्यात आलेल्या अशा स्त्री तत्वाचं कौतुक करणार आहे आणि तीच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानणार आहे ती आमची गौरी. 
मी माझ्या घरचे आमचं घर छान ठेवतोच पण गौरीच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. तीचा हात फिरला की घर चकाचक. गौरीला  पण मी साधारण १५ वर्ष ओळखते, ती कामाला आहे याला पण बरीच वर्ष झाली. घरात पुजा असो वा काही कार्य आधी गौरी आहे ना हाच विचार येतो. ती आहे म्हणजे काम हलक होतं. एकदम मितभाषी, विश्वासू आणि काहीही विचारलं सांगितल की हलकस गोड हसणारी, मेहनती, ऊत्साही आणि वेळप्रसंगी मात्र खमकी व्यक्ती.
स्वकष्टाने ऊभ राहून मुलांना ऊज्वल भविष्य देणारी, माहेरच्यांवर जीव ओवाळून टाकणारी, त्यांच्या पाठबळासाठी परमेश्वराचे आभार मानणारी,  लहानवयात स्वतः ला सिद्ध करणारी कौतुक करण्याजोगीच आहे. आजचा दिवस तीचा.
५) मंजु कोचर. २६ सप्टेंबर २०२५
"सुनो sss" असा आवाज आला रे आला की आम्ही बिल्डींगमधल्या सुंदर सद्गुणी मुली कान देऊन ऐकतो. हा करडा खणखणीत आवाज आमच्या मंजुचा. पेशानं ही शिक्षिका पण आमच्यात वावरते मात्र जवळघ्या घट्ट मैत्रीणीसारखीच. जगमित्र हे बिरूद तीला चपखल लागू होतं. ईतकं जोमदार ऊत्साही कोणी कस असू शकतं?  हे मंजु कडे बघून मला कायमच वाटतं. १५-२० वर्ष एकाच बिल्डिंगमधे राहुन सहवासान एखादी जस वागेल तश्शीच ही तीन वर्षाच्या सहवासात आम्हाला लाभली आहे.  ती फिटनेसवर पण बारकाईने लक्ष देते, टापटीप राहणं व वक्तशीरपणा हे तीचे गुण, ती कोणत्याही अडचणीत केव्हाही मदतीला हजर असते.
माझ्यापेक्षा मोठी असली तरी मी काय सगळ्याच तीला एकेरीच हाक मारतो. ती आपली वाटते. नोकरीमुळे माझा तीचा सहवास ईतरांपेक्षा किंचित कमी आहे पण तरी ही तुफानमेल मला बरच काही शिकवून जाते.
यंदाच्या नवरात्रातील पाचव्या माळेला मी मंजुमधल्या स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते. आम्हा सगळ्यांना मंजुसारखं एनर्जेटिक राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे ग जगदंबे!

६) काकुबाई. २७ सप्टेंबर २०२५
काकुबाई हे पासष्ठच्या आसपासच्या वयाची नऊवारी लुगडं नेसणारी एक स्त्री. सौभाग्य खुप आधी गमावलेलं... माझ्या लहानपणातलं महत्वाचं मायाळु अन्नपूर्णा असं प्रेमळ व्यक्तिमत्त्व!
कायम डोक्यावर पदर, सतत स्वयंपाघरात कामात, कधी दुर्मुखलेल्या नसणार, आख्या वाड्यातल कोणाचही कोणी आलं आणि आपण घरी नसलो तर या अदबीन आदरसत्कार करणार, चुलीवर काम करायचा हातखंड, गौरी गणपतीत भिंत सारवणं तीला गेरू लावणं निगुतीन करणार, वाड्यातली सगळी लेकरं काकुबाईंनी भरलेल्याच माठातच पाणी पिणार तेच फक्त कस गार असतं? हे कोडच होतं आम्हाला.
१० बाय १२ च्या खोलीत अतिशय सुखानं कुटुंब नांदू शकतं हे यांच्याकडे बघुनच समजेल असं. कधीही पितळीच्या त्यांच्या सगळ्या भांड्यांची चकाकी कमी दिसणार नाही. सगळ कसं लख्खं असणार. खुप खुप प्रेमळ होत्या त्या. तश्या काकुबाई परत आयुष्यात आल्याच नाही.  त्या गेल्या तेव्हा मी पुण्यात नव्हते, मला ते फार उशिरा समजलं. आपल बागडतं लहानपण बघणार एक व्यक्तीमत्व हरपल्याच दु:ख होत ते... बालपणीच्या चौकटीतल कोण कोण दिसेनास होतं ना तेव्हा काहुर माजतं मनात....
कोणीही आलं, कोणाच कोण जरी असलं पण दारात असेल मग ते स्वतः च्या घरच्या असो वा वाड्याच्या यथायोग्य आदरसत्कार करणं ते करून होणारा आनंद अनुभवणं मी त्यांच्याकडे बघुन शिकले. आजच्या सहाव्या माळेला मी काकुबाईंच्यात्या स्त्री तत्वाचं कौतुक करून आभार मानुन करू इच्छिते.
(संग्रहित) (मुलीचा मुलगा असाच अंगाखांद्यावर वाढलेला)

७) पोस्टमन ऊर्फ पोस्टवुमन ताई. २८ सप्टेंबर २०२५
सलग चार वर्षे मी या नवतरूण पोस्ट वुमनला भर दुपारी ३-३.३० वाजता ऑफिसमधे टपाल आणुन देताना बघतेय. आधीचे जे काका होते ते निवृत्त झाले नंतर मी आली. तरी त्यांच्या ईतकच लक्ष देऊन ही पोस्टेज पोचवते. आवरून असते एकदम टवटवीत पावडर कुंकू टोपी पाणी बाटली आणि जड खाकी पिशवी. मी आवर्जून पाणी विचारतेच. तो एकच काय तो धागा. आधी बर वाटायच दोघी होता आता त्या दुसऱ्या ताई दिसत नाहीत. अस लक्ष असतं. आपुलकी असते. जी आधीच्या काळातल्या पोस्ट मनकडे असायचीच अगदी तीच. 
वय काय फार नसेल २५-२६  पण या वयाच्या ईतर मुलींपेक्षा वेगळी वाटते. कौतुक वाटत कारण सांगायला नकोच!  मी फोटो काढला नाही प्रतिकात्मक लावतेय कारण तीला कामात काही अडचणी नकोत.
आज सातव्या माळेला या पिढीतल्या नवयुवती पोस्ट वुमन मधल्या स्त्री तत्वाच मी कौतुक करते आणि आभार मानते.
(संग्रहित)
प्रतिक्रिया पाहून सुचवली गेलेली ही ईमेज

८) मंजुषा थत्ते. २९ सप्टेंबर २०२५
मंजुषा माझ्या शाळेतली पण मला ही ओळख खुप नंतर समजली. आपण आयुष्यात एखादी गोष्ट जेव्हा ध्यासान करतो ना तेव्हा विश्वपण आपल्याला मदत करत हे मी अनुभवलं. श्रीकृष्ण कृपेने अधिक महिन्यात ३० रांगोळ्या काढल्या त्या पाहून शाळेत्याच एकीन मंजुषा कृष्ण वृंदावन बद्दल रोज लिहते ते शोध वाच. तुझ्या आवडीच आहे. हा ईश्वरी संकेतच होता जणू. 
वृंदावन च्या लालजींना समजुन घण्यासाठी मला मार्ग सापडला. ती ही मंजुषा अवखळपणे खळखळत्या झर्यासारख लिहुन लालजींच्या लीला आम्हा सामान्यांपर्यंत पोचवते. ती गेलीय का तिकडे? ती कशी लिहते? जे लिहते ते खरय का? असले प्रश्न मला कधीच पडले नाहीत. 
ती आमच्यासारख्या कृष्ण भक्ती करतो अस थोडस वाटणार्यांना त्याच भक्तीमार्गावर सतत ठेवण्याच काम करते हे मात्र खरय २००%. कधी वृंदावन चे लालजी दर्शन लाभ देतील ठाऊक नाही पण आजच्या आठव्या माळेला मी  लालजींची अस्मादिक म्हणून ऊल्लेख करणार्या मंजुषाचे कौतुक करते आणि आभार मानते.
जय श्रीकृष्ण!


९) नर्स : ३० सप्टेंबर २०२५
गोष्ट आहे २२ वर्ष पुर्वीची. पहाटे साडेपाचला त्या फडके हाॅस्पिटलमधे दिसल्या, मला पाहताच हसल्या. तिथच मला मनान हलक वाटल होतं. मी आई होताना  डॉ. पै रायतूरकर यांच्या सहकर्मचारी / नर्स होत्या. जवळजवळ दोनतासात त्या मला परमेश्वराची छबीच वाटलेल्या. थोड्या जाड, कडक साडी नाईट शिफ्ट संपत आलेली वाटणार नाही ईतकी व्यवस्थित, प्रेमळ, हसतमुख त्यांनी मला ताब्यात घेतलं. माझी वेळ काही येईना नाॅर्मल साठी जेवढ मी कष्ट करत होते त्या पूर्ण पणे त्यात सहकार्य करत होत्या. त्या खोलीत नंतर ती आणि मीच आधी बाहेर आई तरी होती.
बोलत होतो मधेमधे आम्ही. सातला ड्युटी संपते माझी मी नसेन काळजी करू नको होईल नीट. मी डबडबल्या डोळ्यानी नका ना जाऊ तुम्ही च थांबा म्हटलेलं त्यांना. अग सगळ्या सारखच बघतात मला जायला हव माझी लेक पुरणपोळी करणार म्हणुन वाट बघेल. मी काही बोलले नव्हते लेकरासाठी जायच म्हटल त्यांनी त्यात मी तोच जीव तुटणारा अनुभव घेतच होते.
मी खुप कन्ट्रोल केलेला क्षण आजही काटा आणतो.  दोन तासातल्या सगळ्या घडामोडींची ती साक्षिदार होती. तेव्हा ती नर्स मला आपली जवळची वाटु लागली होती.  ती मला समजुन घेत होती आता कोण असेल देव जाणे मलाच माझ दीव्य पार पाडायचय मी मनाला ठणकवलेल आजही लख्ख आठवतय. 
सात सत्तचाळिसला त्यांनीच मला माझा प्रणव दाखवला. तो क्षण आयुष्यात कधी विसरायची नाही मी. नंतर त्याला आंघोळीला नेल तेव्हा माझ्या जवळ आलेल्या आणि म्हटलेल्या ताई छान नाॅर्मल झालीस मी होते इथच. माझा पण पाय निघवेना म्हटल लेकरू पाहाव अन मगच जावं. आज माझ्या पण लेकीचा वाढदिवस असतो बरका! आज सात पूर्ण झाली.
अवाक् होते मी क्षणभर...  आज नवरात्रीच्या या नवव्या माळेला मी त्या नर्सच कौतुक करते आणि अनंत आभार मानते.
(संग्रहित)

१०) जया शिवहरे १ ऑक्टोबर २०२५
यंदा नवरात्रीत एक दिवस जास्त आला. योग असेल ते होतच. आजच्या दहाव्या दिवशी मी अश्या स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार व्यक्त करणार आहे जी मला फार आवडते. तीचा धीरान घेणे तसेच कोणत्याही परिस्थितीत सहनशीलतेनं सामना करणे हा बहुमूल्य गुण आहे.

माझ्या लग्नानंतरची भेटलेली ही आणि आजची ही यात तीच्या आयुष्यातील प्रगतीचा क्रम चढताच आहे, पण ती अजुनही जमिनीवर आहे. तीच्या आयुष्यातला सगळा प्रवास एका खमक्या स्त्री तत्वाशिवाय शक्यच नाही. वार्षिक एक भेट ईतकाच सहवास आमचा, पण माझ बोलण 'त' वरून ताकभात ओळखणारी, सतत आदरातिथ्य करायला सज्ज अशी सुंदर जया (भाभी) खुप वेगळी आहे.

या प्रेमळ स्त्री तत्वाचे आभार आणि कौतुक आजच्या दहाव्या दिवशी करते.

आणि यंदाच्या नवरात्रातल्या तीनच सुचवलेल्या आणि पुरा करून घेतलेल्या संकल्पाची सांगता करते. हे जगदंबे असेच काही ना काही सतत करत राहुन सेवेत राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे. जय जगदंबे
जय श्रीकृष्ण 
सौ. गौरी पाठक 
९९७०१६८०१४

बाप माणूस

बाप माणूस 



नवरात्रीचे नऊ दिवस आयुष्यातली स्त्रीरूपातली नऊ तत्व आठवली ती कागदावर उतरवली. तेव्हाच मनात विचार आला होता की पुरुष पण बरेच मोलाचे काम करतात त्यांच कर्तृत्व उजागर होत नाही.
मी मनापासून नमन करते, आठवते, मानते असे निदान नऊ तरी बाबा लोक / पुरूष तत्वं नोंद करू शकते का ? विचार सुरू झालेला. लगेच रात्रीच नोट्स मध्ये नोंदी सुरु केल्या. यादी तयार होत होती पण सविस्तर लिखाण काही झालं नव्हतं. नुसतं मनात होत. आज अष्टमी माझ्या आप्पा काकाचा आणि या दिवसाचा माझा खूप घनिष्ठ संबंध. मग काय खाल्ली उचल काढलं लिहून. काही काही विचार केला नाही फक्त रीती झाले. 
---

१) बोरकर काका 
बाबांचे अगदी जवळचे दोस्त बोरकर काका. तसं बाबांचे खूप खास दोस्त खूप खूप कमी होते. बाबांचा फॅन क्लब मात्र खूप होता. दोनच व्यक्ती दोस्त म्हणून मला आठवतात एकांच नाव आठवत नाही चेहरा मात्र लक्षात आहे आणि हे दुसरे बोरकर काका.  आज बाबा गेल्यानंतरही ते त्याच हक्कानं बरोब्बर ठराविक वेळेला फोन करतात. अजूनही बाबांच्या गेल्याच्या तारखेला भरभरून आठवण आली ग दिलीपची म्हणून मन मोकळं करतात त्यांचंही आणि माझही होतं.. माणूस जिवंत असताना वाढदिवस लक्षात ठेवतो आपण पण तो नसतानाचा तो हृदयदारक दिवस लक्षात ठेवून त्या दिवशी आठवण काढणारा हा त्यांचा मित्र माझ्यासाठी बहुमूल्य आहे. भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच जिंकली कि ते फोन करतात. आज दिलीप असता तर जल्लोष साजरा केला असता. निवडणूक झाल्या कि भाजप तसेच आर एस एस च काही असल कि हमखास त्यांना बाबांची आठवण येते. दिलीप आज असता ना गौरी मोदींचा फोटो डोक्यावर घेऊन नाचला असता, आज मोदींच ७५ वर्ष आपला दिलीप पण आज इतकाच असता. दिलीप अस म्हटला असता दिलीप तस म्हटला असता. काय नातं ना मैत्रीचं गाढ. दोस्त हयात नसताना पण आठवणीनं व्याकुळ होणार जिगरी माणूस बाबानी कमावला.  असा हे सदाबहार व्यक्तिमत्व! दहा बाय दहाच्या खोलीत ४-५ मुलांचं कुटुंब, त्यात आई, आला गेला सगळं पाहत नोकरी करून उरलेला वेळ रिक्षा चालवत घरात सुबत्ता नांदवणारा, अत्यंत मेहनती खरंच कुठून आली असेल या पिढीला इतकी शक्ती.  आज १३ वर्ष बाबा दिवस आला कि मी मुद्दाम काकांना फोन करते. जुन्या आठवणी उजाळा मिळतो. काका न चुकता सणाला शुभेच्छांचा फोन करतात जो मला काही अजूनही जमत नाही. त्यांच्या मनातला दिलीप दोस्तीच्या टॅग मधला खूप मस्त आहे. कान्हजी काकांना आरोग्य संपन्न आयुष्य प्रादन करो.

२) आप्पा काका 
आज अष्टमी आप्पा काकाला मी बघिलेलं बोललेलं मायेचा ओलावा अनुभवलेला शेवटचा दिवस. नंतर तो नसेल असं वाटलंच नव्हतं. तसा  हा कडक आणि तापट  दिसणारा पण प्रत्यक्षात अत्यंत प्रेमळ. कोणी काहीही केलं कसाही वागलं तरी तो इतका सकारात्मक होता कि जाऊ दे गौरी दे सोडून कुठं विचार करून त्रास करायचा हेच आणि फक्त हेच सांगायचं. तुला अध्यात्माची आवड आहे ती सोडू नको तीच कायम कामी येते. आयुष्यात तीच कृती बळ देत असते. देवाचं रोज म्हणायला जमल नाही तरी जमेल तसे करत राहा. पोथी वाचायचा मार्ग सोडू नको. तू आहेस ती खूप छान आहेस तुझा आवडता मार्ग, वागण्याची पद्धत जगाच्या लेखी कशी ते पाहू नको आहे तशीच राहा. मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. सगळ्यांना धरून राहायची सवय खूप चांगली. तू आलीस कि खूप बर वाटत. तो पोथी खूप मोठं मोठ्यानं वाचायचा, सगळं घर तेव्हा शांत हव असायचं. इतरांना तो हातवारे करून कुजबुज केली कि रोखायचा. काय हा असा वाच कि तुझं तुझं असा आम्हाला वाटायचं. हल्ली हल्ली मलाही जाणवत कि मी पोथी वाचताना जर कोणी आवाज केला, कुजबुजला कि माझा पण पोथीचा आवाज वाढतो. हे जेव्हा होता ना तेव्हा मी मनात खूप हसते. आप्पाला एकदम कडक इस्त्रीचे कपडे आवडायचे. चपचपीत तेल आणि भांग पाडणे म्हणजे आवरणे हा त्याचा फंडा होता.  भारी होता तो. माझे बाबा भाऊ आणि तो आप्पा! नवरात्रीतल्या अष्टमीला त्याचा विचार आजही माझ्या मनात काहूर माजवतो. त्याला माझा मनापासून नमस्कार. 

३) आप्पा बामगुडे 
बामगुडे आप्पा हे एक बहारदार व्यक्तिमत्व होतं. काय शाही जगायचे ते, मुंबईत राहायला छोट्याश्या चाळीतल्या छोट्याश्या दोन खोल्यातच. पण राहणीमान एकदम शाही, म्हणजे मनाने दिलदार, कधीही आले ना घरी कि दमदार आवाजात मुंबईच्या भाषेत बोलायचे. एक शब्द आहे तो फार आवडायचा मला : बाबु. अशी आम्हाला हाक मारणार कोणी नव्हतंच. खूप खूप आपुलकी असायची त्या शब्दात. ओतप्रोत माया असायची त्या शब्दात. आमच्या बाबांवर खूप जीव होता. दोघे साडू मनानं खूप मोठे होते. अशी दिलदार जोडी मी फोटोत टिपलेली आहे. घरात पाच मुलांचं करून गावाचं मोठं खाटलं पण आपलं समजून सांभाळायचे. गावाला जायचं असल कि पुण्यात येत आणि न चुकता दिलीपरावांना भेटून जात. बामगुडे आप्पा जगाला सामावून घेण्याच्या वृत्तीचे होते. आमच्या घरी जे वाढू दे जेवायचे कधीही कुरकुर नसायची. कर्तृत्वान माणसाच्या नेहेमी पाठीशी असायचे. नीट राहायचं बारका  ग बायांनो! असा आम्हा दोघीना नेहेमी म्हणायचे. मी खेड्यातला तुम्ही सरकारी कामातलं पण पोरांना खूप शिकवायचं दिलीप राव. त्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे. यावर दोघे एकमत असल्यानं खूप गप्पा होत असत. माहिमचा हलवा त्यांच्यामुळे मला ठाऊक झाला. अश्या दिलदार कष्टकरी सतत कोणासाठी काहीतरी करायची धडपड असणाऱ्या बामगुडे आप्पाना माझा मनापासून नमस्कार. 

४) आप्पा भांडवलकर 
भांडवलकर आप्पा हे माझ्या माहेरचे शेजारी. कायम तंबाखू तोंडांत. त्यांना बोललेलं ऐकलं ते खूप खुप कमी. कमालीचे शांत होते. घरात पाच मुलं, दुसरी बायको आक्रमक वृत्तीची, (परिस्थिती माणसाला तसे बनवते हे अक्कल आली तेव्हा समजलं ) आधीच्या बायकोचा एक मुलगा तो पण सांगू ते तसच करणारा सद्गुणी. ते सगळं सांभाळून घेत जगायचे. एवढ्या मोठ्या कुटुंबात कधीही आप्पांचा आवाज आलेलं आम्हाला कोणालाही आठवत नाही. आप्पा कामावरून आले कि मुलं पिशवीत काय आणलाय बघायला धावत असायची. आप्पांचा पेहराव म्हणजे जुनी मळकी बंडी, तिला पोटावर दोन खिशे, उभा चेहरा कायम, तंबाखूचा तोबरा आणि पांढरा पायजमा. त्यांच्याकडे बघून नेहेमी वाटायचं कस भागवत असतील हे एवढं कुटुंब ते पण विविधतेतलं. जमवून घेणं खूप खूप कठीण असत. आप्पाना ती कला खूप छान जमे. काहीही असल तरी सण मात्र दणक्यात साजरे होत त्यांचे. अनेक वर्ष झाली त्यांच्या परिवाराशी संबंध नाही. पण कायम आहे त्या परिस्थितीत आनंदी असणारे भांडवलकर आप्पा कायम लक्षात आहेत.  

५) बाबा : दिलीप भालचंद्र घाणेकर.
लहानपणापासून आईच्या हातच सुग्रास जेवत आलेले, आईच्या माहेरच्या गोतावळ्यात रमणारे, आईच आजारपण असल्यामुळे घरासाठी कष्ट करणारे, परिवारासाठी नातेवाईकांनसाठी जीव टाकणारे आई वडिल पाहात मोठे झालेले बाबा. कमालीचे हळवे होते. लहान वयात कष्ट करून मोठेपणा अंगावर आलेला, भावांच भरभरून प्रेम लाभलेला मातृभक्त माणूस! 
अत्यंत प्रामाणिक आणि आध्यात्मिक असा यांचा समाजातला वावर, कोणाचही मन आपलेपणान वेधून घेत असे. ते फार वेगळे होते कायम आणि कायमच काहीही केल तरी एकच विचार आधी यायचा त्यांना की जे करतोय त्याचा ईतरांना त्रास तर नाही ना होणार. अशी माणस खुप कमी असतात. त्यांची सुखाची व्याख्या खुप वेगळी होती. कोणी कसही वागो आपण आपल्या परीन सगळ्यांचच जास्तीत जास्त चांगल करायच गौरी. ही खुप मोलाची गुरूकिल्ली त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्या पुण्याईन आयुष्यात लाख मोलाची माणस लाभली. या बाप माणसाला माझा सलाम! आणि घट्ट मिठी.....

६) साठे सर 
आपल्याला ज्या गोष्टी केल्यान समाधान वाटत त्या सातत्यान करत राहायची इच्छा असते. तेव्हा त्या सुसूत्रतेन कशा करायच्या याला कोणीतरी मनाला पटून समजवेल अशी व्यक्ती लाभावी लागते. यासाठी मला लाभलेले हे साठे सर.
वागताना शिस्तीच पण मिश्किल अस गुरूच व्यक्तिमत्त्व. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी कस शोधून ते जगतील यावर भर त्यांचा.  हे माझे कोणत्या विषयाचे गुरूजी हे महत्वाच नाही तर विद्यार्थी सराव आणि सातत्या वापरून ठोकुन पुढ गेला पाहिजे असा हा हाडाचा शिक्षक‌.
एक शिक्षक म्हटल की आदरयुक्त भिती ही असतेच पण मला ते मनापासून आठवणीत राहतील आणि राहतात. कारण जो अभ्यास मला करायचा होता तो शिकताना मी ईतकी पद्धतशीर आणि तपशीलवार शिकु, वागु आणि जगु शकले आणि शकतेय हे फक्त आणि फक्त यांच्या च मुळे. सुरवातीपासुनच अध्ययनातच्या पद्धतीच्या नियमांचा काटेकोरपणा ईतका मस्त मनावर कोरला ना यांनी मी यासाठी यांची शतश: आभारी आहे. असे बाप माणूस शिक्षक लाभण भाग्यच!

७) अक्षय शहापूरकर सर 
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर योग्य वेळी योग्य गुरु लाभण नशिबच लागतं. रांगोळी काढण्याची मनातली सुप्त ईच्छा मी जशी जमेल तशी काढुन मनान सुखावत असतानाच अक्षय सरांच गुरूंबद्दलच्या रांगोळी च प्रदर्शन बघण्यात आलं. झाल की ठरवलच या बहुमूल्य कलाकाराकडून ही कला शिकण्याची मनातून तीव्र इच्छा पुरी करायचीच.
पहिल्याच दिवशी वर्गात सरांनी मन बुद्धी दोन्ही भारावून टाकलं. इंजिनिअर असूनही ऊत्तम आध्यात्मिक बैठक आणि वैश्णवपंथी भक्तीची सुंदर झालर त्यात सामाजिक जबाबदारी च भान अस सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व कलेचा गुरू म्हणून लाभलं. हाताच्या बोटानी रांगोळी कशी धरायची त्याबरोबर आद्ध्यात्माचही बोट कसं धरायच गरजेच हे शिकले सरांकडून. चालत बोलत माणुस रांगोळीतून ऊभ करणारे हे सर अतिशय प्रगल्भ आहेत. काय काय शिकायच यांच्याकडून, अबब!
रांगोळी ची पहिली लेवल  केली त्यानंतर पुढच अजुन झाल नाही पण रांगोळीतून जग बघायला शिकले.  अक्षय सरांच्या विविध कलाना पाहुन वाटत की ठरवल तर मानव काहीही शिकू शकतो. माझ्या कलेच्या गुरूना आदराचा नमस्कार.

८) आपटे काका 
नागावच्या वाडीचे हे मालक. नागावच्या समुद्र किनार्यालगतची यांची छोटीशीच वाडी, दोन दोन खोल्या अशी चार घरं लागुन लागुन, मोठ्ठं स्वयंपाकघर आणि समोर व्हरांडा. बाह्याचा पांढरा बनीयन आणि हिरवे निळे पट्टे असलेली हाफ पॅन्ट ऊर्फ विजार.
दिवसभर वाडीच काम करणारे हे दमलेले मी कधीच बघितले नाहीत.  घरातल्या सहा कुंड्या आवरून ठेवताना माझी ओढाताण होते, आवडीनच करते मी प्रश्नच नाही पण मी दमते आणि हे एवढी वाडी आवरणारे काय मेहनत ती! आमची सुट्टी वाडीत मस्त जात असे. ते आजही लक्षात आहेत ते त्यांच्या वाडीतल्या अफाट कष्टामुळेच. त्यांच्या सारखा स्टॅमिना हवा. 

९) गायधनी आजोबा 
पूर्वी पोस्टाच सेव्हिंग करायचा कल जास्त होता.  तेव्हा हे गायधनी वय वर्षे ७९ - ८० आमच्या ऑफिस मधे यायचे. दरमहा पोस्टाच रीकरींग नेणे नवी योजना सांगणे. नंतर ते म्युच्युअल फंड च पण सजेस्ट करायचे. २००६-७ साली मला पण पकडलेल बचत का आणि कशी करण गरजेच आहे.  मला वाटायच पगार तो किती बचत काय होणार त्यात. पण ते म्हणत पगाराचे ५% गुंतवणूक करायची सवय लाव तर ती हळूहळू १०-१५% पर्यंत करण्याची सवय लागते. मी फक्त हसुन हो म्हणायची. 
एकदा करच १०००.०० च तरी गौरी तू पण, या म्युच्युअल फंडमधे आग्रह धरला. माझा अनुभव आहे की याचे दोन वर्षांत चांगले रीटर्न येणार. सगळ्यांनी केल कुणी १००००.००, २००००.००, ५००००.००. मला १०००.०० गुंतव म्हटले मी ठिक म्हटलं आणि गुतवले. दोन वर्षानंतर गायधनी आले आणि चक्क १०००.०० चे २२००.०० झालेत अस सांगितल. अचानक समोर आलेलं हे फार मस्त वाटलं. बचतीच महत्व पटलं.  आपुलकीन सगळ्यांना ते बचतीच सांगायचे. त्यांच वय पाहता कौतुक वाटायचं. कोरोनाच्या आसपास वय वर्षे ९५ असतानाच ते जगात नसल्याच समजलेलं.
बचतीची सवय लाऊन महत्व पटून देणारे गायधनी कायम स्मरणात राहतील.

आयुष्यात येणाऱ्या सर्व बाप लोकांना आज नमस्कार 
जय श्रीकृष्ण 

गौरी पाठक 
९९७०१६८०१४

Sunday, 14 September 2025

मला काही समजतच नाही? कनचं

मला काही समजतच नाही? कनचं
सद्ध्याच्या काही सुशिक्षित हुशार सुजाण बायका मुलींच्या तोंडच हे वाक्य. कनचं? हे मी लावलेल बिरूद. त्याचा अर्थ कोणतं? 
कोणत्याही बाबतील स्वतःला कस हवं याची परिभाषा यांची पक्की असते. फक्त करायच कस ते समजत नाही ऊर्फ सुचत नाही किंवा ते मी का करू?  ते माझ काम आहे हे सुचत नाही. स्त्रीसुलभ क्षमतेत असणारा समजुन ऊमगुन करणं हा गुण हल्ली कमीच दिसतो.
------
अग गाडी मेन स्टॅड ला लाव.
नाही येत मला.
अग पण काल तर लावलेलीस ना? दोन गाड्या जास्त मावतात.
हो पण काल श्युज घातले होते. श्युज असतील तरच मला मेन स्टॅड गाडी लावता येते.
(खच्याक्) 
आम्ही पांढरी निळे पट्टे असलेली स्लीपर घालुन पर्वती चढलो यांच्या वयात.
------
पोहे काय असतात कोपऱ्यावरचे!
मला फार वेगळे वाटले नाहीत. Any special?
खाताना पदार्थ कसा हवा यावर ताशेरे.  करता कुठ येतय?
कसे पोहे हवेत हे केल्याशिवाय कळणार नाही. यांचे नखरेच खुप.
गोड पदार्थ हवा पण वेलची नको. ती नसलेलच खाणार.
(खच्याक्)
यांना करायच जमल पाहिजे हे सुचत नाही पण खाण्यात काय हवं कस हवं ते स्व:च मत तत्काळ नोंदवणार.
-----
ईकडे ही सोय हवी ती सोय हवी अश्या ठसक्यात प्रतिक्रिया देणार. 
पार्टीत बिर्याणी आणा.. हौस भारी पण वाढायची कशी समजत नाही, खाऊन झाल्यावर आपली प्लेट dustbin bag मधे टाकायची सोय सांगितली नाही म्हणून टेबलवर जमा करून निघून जाणार.
होती का dustbin bag तिकडे?
(खच्याक्)
आपला आपणच वापरलेला परिसर आवरायच समजत नाही.
------
आज काय सण का? अच्छा मी काय करायचय.
अग तुमच्या भागातला सण ना? 
हो, पण मला काही ठाऊक नाही.
(खच्याक्)
आमच्याकडे अस असत चा डंका मारताना तो नियम म्हणून समजुन पाळावा हे सुचत नाही.
-----
आपणहुन खर्च करण स्वभाव नाही पण ईतरांनी सहभागी करून घेतल तर आवडतं.
पण एकत्र रीक्षान गेल की उतरल्यावर पैसे आपणहून देण्याच मला सुचतच नाही.
(खच्याक्)
दुसरा पैसे देईल तोवर थांबायच म्हणजे बीपी हाय अशी आमची स्थिती .
----
आज मी मस्त भाजी करा सांगितल घरी.
अग आज हरतालिका ना? ऊपवास तुझा नसेलच आईचा असेल ना पण.
हो वहिनीचा पण आहे. मी आणि दादा मस्त मेनु कर संध्याकाळी आज शुक्रवार आहे सांगुन टाक लं.
(खच्याक्)
आणि यांना बरोबरीचा नवरा हवा. स्वतः च पोट तरी हव ते करून भरता येत का? नाही तेवढ मात्र सुचत नाही.
-----
आपण एकत्र जेवण करू या का?
हो चालेल काय काय करायच? मी मदत करेन अंदाज मात्र मला समजत नाही.
मी काय करू?
(खच्याक्)
आम्हाला समोर दिसायच काय करायच ते. यांच अजबच गणित, यांना समजतच नाही.
---
नवरा हा गहन मुद्दा.
काय ग कसा हवा नवरा?
माझी तर चेक लीस्ट च रेडी आहे.
(खच्याक्)
चेकलीस्ट करून नवरा बायको होत नसतात. एकमेकांच्या सहकार्याने एकत्रीत चेक लीस्ट पूर्ण करायची क्षमता असेल तरच लग्न होतील. हे यांना कधीतरी समजेल का?
-----
ऊद्या traditional dress घाला सगळे. खंडेनवमी आहे.
दोन जणी चकाचक साडीत आणि या सगळ्या किती हेवी वाटतय या धोशात दिवस घालवणार.
घातल काय आहे ? तर मैत्रिणीच घर बघायला जाताना घालु ईतका साधा पजाबी ड्रेस.
या लीफच काय करायच?? चक्करच यायच बाकी राहत हे ऐकुन.
(खच्याक्)
खंडेनवमीला काय बहारदार आवरून पुजा होत होती सांगाव नव्हत लागत मोठ्यांना सोनं दिल की नमस्कार करतात.
----
Oh! No! (हाताला क्रीम लावत)
काय झाल ग?
हा आपला डिश वाॅशिंग बार चांगल नाहीये माझे हात आग होतात.
विम बार आहे तो आणखी काह पाहिजे?
ठिके धुते मी डबा रोज तोच वापरून पण नंतर क्रीम लावावच लागतं.
(खच्याक्)
आणि आम्ही राख, नारळाच्या शेंड्याची घासणी, औषधाच कव्हर, निरमा कशाकान भांडी घासत आलो. ओरखडा पण त्रासदायक नव्हता तेव्हा.
यांना गालाला हाताला ओठाला पायाला सगळ्याला वेगळ क्रीमच लागतं.
आणि आम्ही अगदीच गरज वाटली तर खोबरेल तेलाचा ऊपाय करून आजही ठणठणीत आहोत.
---
छान पाच दिवस बाप्पा झाले पण विसर्जनाचा योग नाही.
अच्छा. पण मोदक पार्टी मस्त झाली. दिवस मस्त गेले.
काय काय करायचय? आज विसर्जनाचं?
बघा कस जमतय. ( मनात दु:खाची किनार)
घरी पोचताच... कुठेत सगळे?
विसर्जनाला गेलेत.
एक व्हिडिओ काॅल करून दाखवावा नाही वाटला?  निदान घरचे बाप्पा निघाले असा मेसेज तरी?
सुचलं नसेल?
(खच्याक्)
आपण नसतो तेव्हा जी व्यक्ती आपण लांब असुनही आपली आपली आठवण काढते, शक्य तस तिकडुन गोष्टी दाखवते, निदान अपडेट देते आणि जर तीच नसेल तर तीला साधं बाप्पा निघाले मेसेज करणही सुचलं नसेल?
हे तरी अगदी खच्याक् खच्याक्......
आणि यात आई नावाच पात्र दारातच म्हणणार जा पळ खालीच असतील बाप्पा च दर्शन मिळेल. (तळमळ)
कोणी लेकरू म्हणेल वाटल होत मला फोन करू का ? पण वाटल तु गाडीवर असणार. (प्रेम)
----
अग आपल्या दोस्ताचा वाढदिवस आला काही ठरवायच तर ग्रुप करू का?
ग्रुप परत कशाला? आहे की.
हो का मला दिसला नाही ग?
अग बाई तु नाही का त्यात?  तुझा तो तुझी ती पण आहेत की तिकडे.
मला अस प्लॅनिंग करताना सहभाग आवडतो हे तीला त्याला ठाऊक असुनही मी तिकडे नाही यावर चकार शब्द काढला नाही कोणीही.
सुचलं नसेल गं?
(खच्याक्)
आणि आम्ही आपली समजतो ती जनता सगळी चढलीय ना गाडीत नीट बघुन हुश्श होतो.
अजब तुझे सरकार...
---
अडचणी फक्त ठराविक घरीच जातात त्यांना त्यांच्यावर मात करणारी घरं बहुतेक पाठ असावीत. तसच ही पिढी कर्म करण्याच न समजुन, अस न सुचणं वाली जनता स्वतः चच नुकसान करते. खरतर तीच खरी हुशार सुजाण आहे अस म्हणाव लागेल.
सुचत नाही जमत नाही म्हणतात त्यांच मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीची असो अप्रुपच वाटत मला. स्वतः चा स्वार्थ बरा चपखल कळतो. आपल समजुन करणं जमल तरच ते सुचतं. काहींना आपला विचार करूनच बुद्धी संपते बहुतेक. 
हा न सुचणं, न जमणं रोग आताचया पिढीसारखाच आधीच्या पण दिसतो काही प्रमाणात पण फक्त आई वडिलांच्या पुण्याईमुळे तो ऊघडा पडला नसावा.

यावर माझ्या मैत्रिणीच्या तोंडचा अप्रतिम डायलॉग आठवला तो असा -
"आपण सुखानं‌ नांदतो ही आपलीच चुक ग गौरी. आपल्यात समयसूचकता ठासुन आहे ही आपलचीच चुक ईतरांना तर सुचतच नाही" मला कोणात्याही पिढीतल्या कोणाही व्यक्तीवर बोट ठेवायच नाही पण अनुभव असे आलेत आजुबाजुला की विचार येतो की आपल समजुन आपलस करण्याची कला आपल्यात आहे म्हणून आनंद वाटुन घ्यायचा की दु:ख!
विनोदाचा भाग वगळता मी स्वतःला नशिबवान समजते कारण मी अशी नाही.  या पिढीच कस होईल ही चिंता न करणे आणि याचा परिणाम हा असेल कि या लेखात भर पडत राहणार...
(खच्याक्)
----
आता हे खच्याक् काय आहे ते सांगते आधी.
सर्वसामान्य माफक अस वागण समोर न येता जर काही अस न सुचणारं किंवा बाळबोध किंवा अबोध वागणं समोर आलं तर अवाक् होऊन मर्मी घाव बसतो तेव्हा असा आवाज येतो खच्याक् ही माझी साधी सरळ भावना.
So i am enjoying the company of all types of people's and improving my consciousness definitely growing now with free mind!!
Yours lovely 
गौरी 

Tuesday, 5 August 2025

वास्तव

वास्तव 
आज एका छोट्या मैत्रिणीला गाडीवर घरी जाताना लिफ्ट द्यायचा योग आला. कधी कधी छोटुशी मैत्रीण पण काहीतरी सांगून, दाखवून, शिकवून जाते तशीच हि छोटुशी मैत्रीण. सुटीत घरून आलेली खुश होती. तिघी बहिणी भेटल्या. ताजीतवानी होती. घर आणि घरची माणसं, त्यांचा सहवास हा मोलाचाच हे या पिढीला पण समजतंय पाहून  छान वाटलं. 

ती : मोठ्या बहिणीचं लग्नाचं बघत आहेत, तिला अजून हवी तशी नोकरी नाही, ती इतक्यात नको म्हणतेय. (ती सांगत होती.)
मी म्हटलं : आई वडील योग्य वयात मुलांची लग्न व्हावी हाच विचार करतात. ती उपवर असेल झाली म्हणूनच तुमचे पालक लग्नाचं बघत असतील मला खात्री आहे. 
ती : या टॉपिकवरच आमचं तिघींचं खूप डिस्कशन झालं मॅडम. 
मी : अच्छा!
ती : आमचे आई बाबा आमचं हे विचार पटून घेत नाहीयेत. तुम्ही समजून घ्याल मी सांगते थांबा. 
मी : (बापरे आता काय ऐकायचय रे देवा!) आधी सांग तर मग मी माझं मत सांगेन. 
तर तिघींचे म्हणणे असे :

मोठी : आई का घाई करतेय लग्नाची? २७ वर्षात मी पायावर उभी कशी राहणारे? जरा दोन वर्ष तरी माझा बँक बॅलन्स जमू दे. तर नाही. नोकरी लागलीय आता बास झालं. नोकरी लागली म्हणजे झालं असं नाही . 
मधली : ताई तू आत्ता जे करशील ते तसच मला करायला लावतील. मी अजिबात करणार नाही. 
छोटी : मी काय करू तुमच्यासाठी सांगा. माझं तर दुसराच वर्ष आहे. ताई पण जे करशील ते मलापण सांग ग. 
मोठी : असा नाही ग छोटी. मला पण लग्न करायचंय, मुलं पण झालेली आवडेल. पण जगात जे बघतेय ना त्यावरून आधी पायावर उभी राहणे मस्ट आहे. दोन मैत्रिणीचे डिव्होर्स झालेत लग्नाच्या दुसऱ्याच वर्षात. 
मधली : ओह नो ! म्हणजे लग्न करा करियर गमावा पोरं वाढवा सगळं एकटीनेच. यासाठीच पायावर उभं असलेलं हवं. 
मोठी : पण आई होण्यासाठीचा फिझिकल पिरियड यात मिस होतो हे मला पटलेली गोष्ट आहे. पण ते जन्माला घातलेलं एकटीला सांभाळायची वेळ आली तर मी फायनॅन्शिअली रेडी हवी ना. 
मधली : यासाठीच ताई एग्ज फ्रीझिंग चा पर्याय बेस्ट आहे. योग्य वयातली एग्ज पुढे करियर चा जम बसला कि फर्टीलाइझ करू शकतो. सायन्स किती पुढे गेलाय. 
छोटी : हा ऑपशन भारीय 
मोठी : मी ऐकाय हे पण विशेष माहित नाही. 
मधली : घ्यायची माहिती मग. तुला हवं तेव्हाच लग्न कर एग्ज फ्रीझिंग करून हवा तेव्हा मॉम हो. 
छोटी : तसाही पिरिऑड्स इर्रेग्युलर असतात हल्ली बरेच जणींचे. हा  त्यांना पण होपफुली गुड ऑपशन आहे. 
मोठी : खरंय. कन्सल्ट करून बघेन. 
छोटी : हा ऑपशन विचार करण्यासारखा आहे. कॉस्टली आहेच पण आय थिंक माय जनरेशन विल प्रेफर धीस  मोस्टली. 
मधली : हो कारण आजकाल वूमनला आधीच्या पेक्षा जास्त टेन्शन्स आहेत. सेफ राहून टेंशन सांभाळून हेल्दी जगायचं तर काहीतरी करावाच लागेल. यात ओन बेबीचं सॅटीस्फाकशन आहेच आणि मेंटल  सॅटीस्फाकशन सुद्धा. 
छोटी : ट्रू 
____________
मी गाडीवर बधिर झालेल्या कानांनी सुन्न! या जमान्यातल्या या तीन मुलींचा विचाराचा खेळ काळीज हेलावून गेला. आईपणाची योग्य भावना अनुभवायला कशी मिळेल यांना त्या गोठवलेल्या अंड्याना उपजतांना. ज्या वयात आईपण अनुभवू ते वय परत हवं तेव्हा अनुभवानं इतकं सोपंय का?  खरंच मला हे योग्य कि अयोग्य माहित नाही, पण आता पुढची पिढी इतकी व्यस्त व्यग्र विवंचनांना तोंड देतेय त्यात त्या सुंदर कोमल आणि शब्दात व्यक्त होऊ न शकणाऱ्या आई होतानाच्या भावनांचा अनुभव हुकला जाऊ नये हीच मनापासून इच्छा!
------------------------
ती : सांगा का मॅडम व्हाय नीड टु  वरी ?
मी : तुम्ही वरी नाही ग पण यात शारीरिक अडचणी आहेत त्यांना समोर जावं लागेल कि. (तीच हॉस्टेल आलं तरी आम्ही बोलताच होतो )
ती : वूमेन्स स्ट्रगल इझ गोइंग टु मोर डिफिकल्ट नाऊ, सो वुई नीड टु फाईंड अ बेस्ट सोलुशन, दॅट्स इट !
मी : असेल हि ग तू म्हणतेस तसं पण मन पटकन मानात नाहीये हा पर्याय. मला तो आज समजलंय जो वापरून बऱ्याच जणी जगात जगतही असतील. 
ती : नॉट एव्हरी गर्ल नीड टु डु धिस बट, पीसीओडी ऑर करीयर फोकस मधे डिस्टर्ब नको सारखे प्राॅब्लेम्स असतील तर ऑपशन म्हणून गुड ना?
मी : हसून मान  फिरवत होते मी. (हो म्हणून वर खाली आणि नाही म्हणून डावी उजवीकडे) 
अशा प्रकारे बाय करून मी घरी निघाले खरी पण अनंत प्रश्नाचा गुंता घेऊनच. 
ज्या मुलींना शक्य नाही पण ती मातृत्व अनुभवण्याची आस धुगधुगी शिल्लक राहिल्यावरचा हा ऊपाय असावा. पण हे वास्तव आहे. की अजुनतरी आई व्हायची इच्छा तरी मनापासून आहे या पिढीत.
कदाचित मधलीच म्हणणं बरोबर असेलही. त्याला बरेच किनार (तीर पैलतीर) असणारच पण परमेश्वर करो आणि हि वेळ पुढच्या पिढीत कोणावर न येवो. काहीतरी व्हावं आणि आधिसारखं या पिढीच्या मुला मुलींना त्या त्या वेळच सुख मिळण्यासाठीचा मार्ग सुलभ व्हावा. भावनांना उच्चं स्थान लाभावं. 
तुम्हाला काय वाटतं ? नक्की सांगा. 
सौ. गौरी पाठक 
०६. ०८. २०२५

(दोन तीन ऐकण्यात आलेले अनुभव एकात करून एकत्रित स्वरूपात मांडले आहेत.  )

Monday, 21 July 2025

मनातलं माझ्या


अनुक्रमणिका 
१) नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.
२) वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ
३) कंगोरे
४) कंपन
५) चेपलेली मधली फळी
६) नक्की चुकतंय कुठं?
७) गुजगोष्टी
८) नजर
९) सल
१०) माझी प्रिय सखी
११) ऊत्तर 
१२) प्रश्न 
१३) स्वच्छंदाचा मार्ग मोकळा
१४) मार्ग
१५) पाळी  

*****
१५) पाळी 
पाळी  हा विषय जरा हाताळताना जिव्हाळ्याचा आहे. पण पेरिअड्स असा उल्लेख जरा जास्त दिसतोय हल्ली. हरकत नाही एकूण एकच. विविध वयाच्या काही जणी महिला दिवस साजरा करायला एकत्र गेलो होतो. आमच्या सारख्या काही जणी त्या रिसॉर्ट ला होत्या. आम्ही त्यांचे त्या आमचे फोटो काढून थोडे जवळ आलो होतो. योगायोगानं तिकडे एकत्रित एक डिबेट होता त्यात "पाळी उर्फ परिअड्स" वर मत प्रदर्शन असा विषय होता. 
मुद्दे खूप महत्वाचे होते. काही नवीन विचार समजले. काही जणी पिढीजात पाळी चे दिवस पाळणाऱ्या तर काही झुगारून जगणाऱ्या तर काही नवीन पिढीच्या असूनही जमेल तेवढं जमेल तस मानून समन्वय साधणाऱ्या दिसल्या. डिबेट मध्ये सकारात्मकता होती. शोध होता. तो असा :

एक गट  : ते चार दिवस पाळावेत कि नाही? त्या दिवसांबद्दल तुमचे विचार काय आहेत? हा विषय ऐकून छान वाटलं. मी पाळीचे दिवस पाळते. परंपरेनं शिकात आलीय तस मी चार दिवस पूजा करत नाही. 
दुसरा गट  : मी पाळते कडक पाळते. घरात देवा धर्माचे काहीही करत नाही. पण बाजूला बसणे  वगैरे मला आवडत नाही. त्या ऐवजी मी पूजाच करत नाही. घराचे पण यावर सहमत आहेत. 
तिसरा गट : हो मी पण पूजा करत नाही पण पाचव्या दिवशी गोमूत्र शिंपडून आई करायची तसं घर शुद्ध करते. 
चौथा गट : अशुद्ध! छे छे ... मी असलं स्वतःला अशुद्ध वगैरे मनात नाही. स्त्री ला देवी मानता ना मग तिला पाळी आली ती रजस्वला झाली तर ती अशुद्ध कशी? मी चार दिवस पाळत वगैरं नाही. कारण मी जमेल तसेच पूजा करते. ते पण तासभर वगैरे नाही. रोज फुल काढणे नवीन वाहने हळदी कुंकू वाहने दिवा उदबत्ती बस झाली पूजा. सासू करते चतुर्थी तेव्हा कराची पूजा मोदक तिकडे जाऊन. इतकं ठीके असे माझं मत आहे. 
पाचवा गट : मी चार दिवस आराम करते. पूजा म्हणाल तर फक्त सकाळी अंघोळ झाली कि नमस्कार आणि उदबत्ती. कारण ऑफिस गाठायचं तर याला वेळ देणं अशक्यच. आणि देव माझ्या मते हे सोपस्कार करा म्हणत नाही. मनापासून नमस्कार केला कि त्याला पोचतो. सासू कडे होतच सगळं. 
सहावा गट : हॉस्टेल वर कसलं काय पूजा वगैरे. उठले कि तासाभरात यावरून मध्ये मेसमधूनडबा घेत ऑफिस गाठायचं. पीरिअड्स मध्ये पूजा करू नये हे मी मानत नाही. काय होतं केली तर? 
सातवा गट : व्हाॅट अ बोरींग सब्जेक्ट? लेट्स मुव्ह...

एक : मस्त प्रश्न आहे हा. आजच्या तरुणींना पीरिअड्स मध्ये त्रास होतो तेव्हा त्यांना कामाचा कंटाळा येतो, चिडचिड होते. बरोबर! हेच तर कारण आहे कि. रजस्वला उर्फ पाळी उर्फ पीरिअड्स च्या कालावधीत स्त्रियांचं मन एकाग्र नसत. या कालावधीत स्त्री च्या शरीरात विविध संप्रेरके उर्फ हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना थकवा येणं साहजिकच आहे. अश्या कालावधीत ती एकाग्र चित्तानं भगवंताचं ध्यान करू शकणार नाही. त्यामुळेच कदाचित या कालावधीत पूजा करू नये असे पूर्वजांनी सांगून त्या काळातील स्त्रियांना सहकार्य केले असेल. जसं तुम्ही परिअड्स मध्ये प्रोजेक्ट वर फोकस करू शकत नाही तसेच हे आहे. 
दोन : बरोब्बर! पण आता आधुनिक काळात आधी सारख्या खूप कष्ट करणाऱ्या बायका कुठेत ? मग त्यांनी का हे फॉलो करावं. 
तीन : खरंय ग . पण मानसिक थकवा तर स्त्री मागचा कमी कुठं झालाय? तेव्हा त्यांना शारीरिक कष्ट होते आताच्या स्त्रियांना मानसिक पण कष्ट आहेतच कि. 
चार : एकंदरच कष्टाचा स्रोत बदललाय पण टेन्शन तर आहेतच कि. मग करावा ना आराम चार दिवस. आणि तसही कुठं रोज साग्र संगीत पूजा करतात. 
पाच : हा मुद्दा अफलातून आहे. जब्रा !
एक  : मी जुन्या पिढीची मत मानणारी असले तरी नवीन पिढीने कालपरत्वे बदल करून कमी जास्त करून ते पाळावे अशा विचाराची आहे. पिढी बदलते तसे परंपरेचे नियम कमी जास्त शिथिल असावेत पण ते चूक आहेत अस नाही म्हणू शकत आपण. 
दोन : हो जमतील तशी जास्तीत जास्त परंपरा पाळावी. दिवसभर घरी पूजेची तयारी करणारी अचानक दोन दिवस पीरिअड्स आधी आलेली जर मी असेन तर मी सगळं तसच टाकून निघून का जावं? हात नाही लावायचा पण मी दुरून तर पूजा बघू शकते कि. अशा वेळी मला अछूत वागणूक दिलेली आवडत नाही. 
तीन : हो विचार करण्यासारखा आहे हा मुद्दा. काही जुन्या काळच्या बायका अगदीच हाडहुड करताना मी बघितलंय. त्रास होतो अस बघून. हि विचारधारा नसावी. अर्थात तसं असणारी पिढीचं कमी उरलीय सध्या. 
चार : आजकाल पूजा सोडा रोज दिवा लावला तरी नशीब अस आहे. पण तरी पारंपरिक सण उत्सव साजरे करायची आवड असलेले पण तितकेच आहेत. 
पाच : मी यातून गेलेली आहे. अछूत वागणूक पण अनुभवलीय आणि पूजेची तयारी करून मधेच सोडूनही जावं लागेलेलं आहे. आता मी असं पुढच्या पिढीचं झालं तर मात्र जाऊ देत नाही. थांबा बघा. आपण केलेली तयारी, त्यातून झालेली पूजा, तो माहोल, तो अनुभव घ्या. त्या स्त्रीला अशुद्ध किंवा अछूत किंवा हाकलले फिल न येऊ देता जगू देते. स्रीत्वातील परमेश्वराचा आदर करून दोन्ही पिढीची सांगड घालायचं मी ठरवलंय आणि हे नुकताच केलय पण. आपण जर असा केलं नाही तर हि आताची पिढी परंपरेपासून त्या आनंदापासून दुरावले. 
एक : हो खरंय त्यातील सत्व समजून घेऊन जगायला आधीच्या पिढीने तिला हात द्यायला हवा. तरच धर्म टिकेल. या पिढीचे प्रश्न न कंटाळता पटेल असे उत्तर शोधून निवारण केले तरच काही प्रमाणात परंपरा पुढे जातील. 
दोन : हो विचार केला तर बरोबर आहे. हे का पाळावं अस मला जे वाटत होत यावर सेंट्रल सोलुशन म्हणून नकीच विचार करण्यासारखं आहे. 
तीन : स्त्री तीच आहे तिचे कामाचे चिंतनाचे विचार परिस्थितीने बदलत चालले आहेत. तिच्या काळज्या विवंचना यात अफाट बदल होत आहेत. हा विचार करून मध्य गाठून जगलो तरच खैर आहे. 
चार : प्रत्येक स्त्रीनं उर्फ वूमन उर्फ महिलेने आपल्या आपल्या भोवतीची स्थिती पाहून यावर काम करावं असं वाटतंय आता मला. कोणतेही शिथिलीकरणाचे असे नियम करू शकत नाही ते प्रत्येक स्त्रीनुसार तिच्या आजूबाजूच्या पारंपरिक गोष्टी पाळण्याच्या दृष्टिकोनानुसार ते बदलेल. पण पूजा रोज करावी यावर मी ठाम आहे. ती कशीही करा पण त्या प्रज्ञेला त्या शक्तीला माना तरच तरणार आहोत आपण. 
पाच : या काही मुली ज्या बाहेर पडल्या ना, बोअरींग सब्जेक्ट म्हणत...त्यांचीच जास्त काळजी वाटते कधी कधी. 

आजचा हा डिबेट मस्त होता. महिला दिवशी च निमित्त साधून विविध व्हायच्या महिलांचे विचार समजले. आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद. 
चला लवकर मस्त आयतं जेवायचं आता. आणि सगळ्या पांगल्या बफेकडे मेनू काय पाहायला. 
***************
१४) मार्ग 

आपण जस जस विविध ठिकाणी जातो तस तस आपण वेगवेगळ्या जीवनपद्धती पाहतो. त्या बघुन आपण शिकतो. जगतानाच्या गरजा राहणीमान जीवनाविषयी अपेक्षा यावरही प्रकर्षाने चढ उतार जाणवतात. आपलं ध्येय काय आहे? आपण त्यानुसार जीवनपद्धती अवलंबली पाहिजे.  आजुबाजुला बघितल तरच आपल्याला आपला मार्ग बरोबर आहे की मार्गावर राहण्यासाठी कमतरता आहेत हे समजेल अस मला वाटलं. त्याअनुषंगाने माझा बारकाईनं पाहण्याचा हेका  नेहेमीच असतो. 

काल असच एका कोळश्याच्या खाणीतील स्टाफच्या गावतल्या आयुष्याची जीवनचर्या जवळून बघण्याचा योग आला. खाणींच्या जवळच वसाहती असतात. येण्याजाण्याचा वेळ वाचतो. सुविधा भरपूर असतात  हे दिसलं. पण त्या जपून वापरणं दिसलं नाही, ते वागणं फार काही वावगं नाही असं त्यांच्या वागण्यातून दिसलं. आहे त्या दोन खोल्यात हे सुखानं संसार थाटताना बघितलं. ३०० फुट खोल खाणीत घरचा माणूस मस्त डब्याची पिशवी मिरवत जातो. येताना काळाकुट्ट होऊन येतो. यांच्या राहत्या घरा खाली ठराविक फुट खोलवर खाण आहे, पोकळ आहे. रोज चार ते सहाच्या मधे  पुंगळी खाणीत काही अंतराच्या सेकंदाला जाते तेव्हा ते इतक लांब असूनही हादरतं तरी ते आनंदाने राहतात. लढायला जाताना जसे पूर्वीच्या लोकांना माघारची चिंता नसते तसेच हे खाणीत जातात. परिस्थिती माणसाला कणखर बनवते. काही इमानदार असतील काही नसतीलही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती !
आपण शहरात काय करतो तर सिमेंटच्या जंगलात, प्रदूषणाच्या विळख्यात हायजीनीकली बेस्ट टिफीन घेऊन जातो अगदी तस्सच ते खाणीत जातात . जीवाची काळजी खाणीत काय आणि मोठाल्या हायवेवर काय? आहेच की.  खाणी खूप लांब डोंगराळ भागात असतात त्यामुळे त्याच्या वसाहती पण अश्याच गावाबाहेर असणारचशिफ्टनी होणारे काम त्यात तब्येती जपायच्या. मुलांची शिक्षणं घराची दुखणी खुपणी एक ना दोन आहेच कि. म्हणजे विवंचना कोणासही सुटत नाहीत हेच खरे. 

एक गोष्ट मात्र त्यांची आवडली जस असेल तसे आनंदानी राहतात, त्यात घराबद्दलच्या फार नीटनेटकेपणाच्या अपेक्षा त्यांच्यात दिसल्या नाहीत. जेवणाच्या सुंदर असण्याबद्दलचा हट्ट पण दिसला नाही. अन्न वस्त्र निवारा घराबाहेर दोन चार झाडे त्याच्याजवळ एक खाट आणि एक दुचाकी! बस इतकंच, कोणत्याची गोष्टीच्या लाईफ लॉँग असण्याची धडपड अजिबात नाही. शेजार पाजाऱ्यांच्यात एकी मात्र जबरदस्त  दिसली. आपण ठणठणीत राहावं याबद्दलच्या व्याख्या तर अबब ! पण त्याच बरोबरीनं आलेल्याच आदरातिथ्य पण छान करतात. शहरातील लोंकाच्या दिसण्या वागण्याबद्दल जरा शंका घेत  घेतच बोलतात अस वाटलं. घराच्या लेकरांनी नीट शिकावं हा अट्टाहास आहे पण ध्यास कमीच. तो चूक नसावा कदाचित नाण्याची दुसरी बाजू असेल काहीतरी. 

बोली भाषेतील फरक मात्र खूप आहे. कोशिंबिरीस चटणी तर आमटीला वरण असे नावाचे गफले खूप झाले. खूप हसलो. मजा आली. मसालेदार तिखट भाज्यांचे कौतुक झाले मग मी पण शेपूचे ताशेरे ओढले. लहान मुलं तर फार भारी होती. एकदम  एनर्जेटिक वाटली. या कोवळ्या हातानं वेळीच छान वंगण मिळालं तर आणखी उज्वल भविष्याचे मानकरी होतील हे निश्चितच

माझ्या सुडौल योजनाबद्ध आखून जगत असलेल्या शहरी आयुष्यात मी खूप आनंदी आहेच, पण या कोळसा खाणकामगारांच्या जीवनपटातून मी हे नक्की टिपले कि, कमीत कमी गरजांमध्ये राहायची जास्तीत जास्त सवय सतत करत राहायला हवी.  दोन आयुष्य वेगवेगळीच आहेत, त्यांचे आपापले नियोजन असणे बरोबरच आहे कारण जगताना काय लागेल  ते त्याच जगाच आयुष्य जगूनच समजतं. 

एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगताना पाहून आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव होते आणि आपोआपच परमेश्वराचे आभार मानले जातात. आपुलाची मार्ग भाला रे बाबा!
************************
१३) स्वछंदाचा मार्ग मोकळा !
विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.
एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५


******************************
१२) प्रश्न 
गौरी एक विचारायचं होत की तु सगळयांशी सारखं वागू शकते? का म्हणजे असं की आपण खुप वाचतो, लिहतो.. आणि म्हणतोय पण की लेट गो करायचं.. इन general विचारत आहे..पण काही बाबत आपलं नाही जमत. 
....
एक आठवडा झाला हा प्रश्न मला विचारून तीला. मलाच इतर नैतिक जबाबदारीच्या नादात उत्तर देणं मागे पडलं. पण मनाच्या कोपऱ्यात विचार मात्र सुरूच होता. आज निवांत सविस्तर मला काय वाटतं ते लिहायचाच अस ठरवलं. 

खरा सांगू बरेचदा नाही जमत हे खरंय. अशा केसमध्ये माझ्याकडून आपल्याला आवडेल, खटकणारी नाही इतकाच करायचं किंवा केलं जातं. फार काही नाही तर त्या व्यक्तीपासून थोडं दूर राहायचं असा मी वागलं जात. लेट गो करायचं हाच विचार मनात ठेवतेच पण मी अजून तरी काही साधू संत नाही असा मी मनाला सांगते. पण हा विचार करायला हवा हे समजतंय हेच खूप आहे असा ब्रह्मविद्येच्या शिक्षिका नेहेमी सांगतात. ते आठवून शांत होते. 

ज्या व्यक्तीच्या सहवासातून संतापचा माथी येतो ती मी जरा टाळते. मग मला असा अनुभव आहे कि तीच मला मिस करते. अशी व्यक्ती आहे जिला सोडू शकत नाही आणि धरून पण मलाच त्रास होतो. तीला मी  ऑपशनला टाकलीय. हाक आली तर जायचं नाहीतर ती आयुष्यातच नाही असाच जगायचं. याला १० वर्ष झाली मी ते पाळतेय.

ज्या सखींनी हा प्रश विचारलाय ना ती मला अश्या वेळी भेटली कि मी जे लोकांना सांगत होते कि आयुष्य साध आहे ते आनंदानं जगायचं. मन स्थिर ठेवणं फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. पण एक वेळ अशी आली होती कि मीच डळमळले होते. तेव्हा या नवख्या सखींनी मला ती वाक्य पाठवली. मला कान्हाजींचे अनंत आभार या साठी मानायचेत कि मी आनंदी आहे मला आनंदी वाटत आहे असा मला सांगायला तिला पाठवली. 

माझ्या मनात कुठेतरी काही तरी आहे जे मी मनाला लावून घेत आहे असे तिला वाटले ते बरोबर होते. कारण मला त्या दिवशी खूप हार्ट बिट हाय झालेले जाणवत होते. मनात काही अनेक दिवसाचे आहे का? ते काढून टाक असे ती म्हटली. पण मनात हेच होते कि मला धडधड का होतेय.  त्याच दिवशी मी तात्काळ वाक्य लिहिली : मी आनंदी आहे मला आनंदी वाटते आहे आणि संध्याकाळी डॉक्टर म्हटले "काहीही झालेले नाही गौरी तुला फक्त पोट बिघडलाय आणि हीट मुळे होतंय." काय जादू आहे पहा! 

माझ्या मनात काय आहे ते कान्हाजीनी ओळखून सखीला माध्यम म्हणून पाठवले आणि मीच जे माध्यम होऊन इतरांना सांगते तेच मला कानावर घातले. आहे कि नाही पेराल ते उगवते. 

आता मुद्धा हा कि " गौरी एक विचारायचं होत की तु सगळयांशी सारखं वागू शकते?"
तर नाही वागू शकत अजुनतरी. हेच ऊत्तर आहे.

पण अचानक मला याच ऊत्तर सापडलय.
"जगात व्यक्ती तितक्या प्रकृती ! 
पिंडे पिंडे मतिर्भिन्न : 😊 
हे मर्म समजून उमजून तू वागतेस👍🏻 "

हे याचे उत्तर जे मला माझ्याच एका सखींनी योगायोगानं ओघाने दिले परवा एका लेखावर दिलं. जे मी करतेय वागतेय आणि म्हणूनच आनंदी जगतेय.

आणि मला सखीच्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच सापडले. जे मी जगात होते जशी मी आहे त्यातच तर उत्तर होते. 

कस वागायच? याच ऊत्तर तीच तीच्या जवळ आहे परंतु माझ यावरच मत तीला हवं होतं. ते मला पण सापडलं आणि तीच्यामुळे हा विचार केला गेला. हे एक भारी घडलं आयुष्यात.

प्रश्न विचारलेल्या सखीला पण अनंत धन्यवाद आणि सहज उत्तर दिलेल्या सखीला पण अनंत धन्यवाद !

हळू हळू माझी आणखी खात्री पटत चालावी आहे कि आपल्या लेकरांकडे कान्हाजी बारीक लक्ष ठेऊन आहेत. 

जय श्री कृष्ण 
सौ. गौरी 
१३. ०५. २०२५
**********
११)  ऊत्तर 
पण का हेवा असे जाणून घ्यावासा nahi वाटल तुम्हाला?  असा खुप जणींना प्रश्न आहे 
👇🏻
सुरवातीला नव्हत वाटत कारण समज नव्हती. नंतर वाटल होत परंतु तेव्हा कारण आणि परिणाम यांची श्रृंखला समजुन घेत होते... 

एखादी गोष्ट आपल्या कडे हवी अस वाटण साहजिकच स्वभाव आहे. पुतळ्यावर साडी कशी दिसते बघुन आपण घेतोच. मग नंतर वाटायच देणगी आहे ही मला दिलेली कान्हाजींनी. मी सतत आभार मानले पाहिजेत त्यांचे. मलाही अस वाटायच की पण ते व्यक्त व्हायची सकारात्मकपणे व्यक्त व्हायची लकब दिली होती. हा थोडाफार आई बाबांकडचा अनुवंशिक गुणही असेल. मी पटकन अनोळखी ला पण मस्त दिसतय हे अस म्हटल जातच.. हसतात मला...आणि ती व्यक्ती ते खरेदी पण करते हा पण अनुभव येतो. मग मी हसते...
हे का? कस होतं? ठाऊक नाही. माझी वस्तू आवडली अस म्हटल तर पटकन घाल की एकदा ही सवय वाडा संस्कृती मधे वाढल्यानं लागलेली. वाड्यातल्या एका काकु ला सासरी लग्नाला जाताना हक्कान हातच्या पाटल्या बांगड्या विश्वासान देतानाची "मस्त ठसठशीत मिरव बरं का! " पिढी मी बघितली आहे. आपण जे पाहतो ते आपलं अंतर्मन नोंद करत हे मला पटलय. ते कधीतरी पेरलेल ऊगवत हाच तो कारण आणि परिणाम अभ्यास असावा.
पण हा प्रश्न विचारला म्हणून धन्यवाद मला हे कधी सांगाव लागलच नसत मी विचार केलाच नसता.

धन्यवाद गं.
गौरी

कृपया साकारात्मकपणेच वाचावे..... कोणाबद्दलही मनात अढी नाही. पण खरं बोलायला "तुझा हेवा वाटतो सांगायला" धैर्य लागतं हेच मुख्यता निदर्शनास आणतेय असेच पाहावे. 

******
१०) माझी प्रिय सखी : तीच नाव गुपितच ठेवणे उचित राहील असे वाटते आहे. 
माझ्या मते आपल्या छान मैत्रिणी तर असतातच. पण सहज कधी कधी सहवासात येणारी पण व्यक्ती आपली मैत्रीण असू शकते. आपल्याला काही वेळा ठाऊकच नसत कि इतकं प्रेमान आपल्याकडे कोणा तिऱ्हाईताच आपल्याकडे लक्ष आहे. 
आपल्या भोवतीच्या सर्कल मध्ये परिवार, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी असे अनेक सर्कल असतात. एकदम पाचव्या सहाव्या सर्कलमधलं कोणी आपल्याकडे व्यक्त होत काय...आणि आपण कसे आहोत समाजत काय.. भन्नाट अनुभव असतो. 
मी जे काही करत आले, जे काही माझे राहणीमान आहे, जी काही माझी वागण्याची पद्धत आहे त्यावरून आजवर अनेकजण माझा हेवा वाटणारे मला समजले आहेत. ते सांगत नाहीत पण बोली भाषा किंवा शुभेच्छांची पद्धत किंवा आपल्याशी वागतानाचे देहबोली हावभाव या वरून ते समजत.
"मला पण हेच करायचं होत पण मला ना अजिबात वेळच मिळत नाही. "
"मला हे येतच पण तुझ्यासारखा सपोर्ट नाही घरून म्हणून ग "
"मला वाटत कि हे करण्यापेक्षा घरी जास्त वेळ दिला पाहिजे, हे करायला आयुष्य पडलय कि."
"मला अशीच साडी घ्यायचीय .... कुठून घेतलीस ग?"
"मी अशीच होते दुसरं मुलं झाल्यावर आयुष्य बदललच म्हणून बाकी काही नाही."

अशी अनंत वाक्य मी आजवर माझ्याशी बोलताना ऐकली आहेत. पण मला अश्यांचा कधी राग आला नाही. तो येऊ न नये यासाठी त्या त्या वेळी योग्य अनुभवी व्यक्ती कान्हाजीनी माझ्या बरोबर ठेवल्या होत्या. ठेवतोच. हि जाणीव मला काल झाली.  

तर काल असं झालं - ती अचानक भेटली. सहजच अगदी न ठरवता. तिला माझ्याकडून जी माहिती मिळाली त्यावर तिला असा वाटलं कि देवानेच मला तिच्यासाठी पाठवलाय. 

ती, "तुझं कौतुक करू तेवढ थोडय ग. मला कधी कधी तुझा हेवाच वाटतो. " 
मी, "अगं हरकत नाही मला सवय आहे."
ती, "नाही गं .... पण मला अस वाटायला नको. मला अस वाटत नेहेमी त्याच मला वाईट वाटतं. "
मी, ..."निशःब्द " (मनात - माझा हेवा वाटतो हे मलाच समोर सांगणारी आणि त्याच वाईत वाटणारी व्यक्ती पण जगात आहे ! मला खूप अचंबित झाल्यासारखं वाटलं.)
ती, "तू अशीच रहा गं पण, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस."
मी, (फक्त हसले, कारण विचार चक्र सुरु झाल होत डोक्यात.)

तर अशी हि माझी माहित नसलेली मैत्रीण. 
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
८ मे २०२५
******
९) सल

काल अचानक काॅलेजच्या तिघी घनिष्ठ मैत्रिणी भेटलो. "त"वरून ताकभात अशा आम्ही तिघी‌. खूप दिवसांनी भेटलो कि मनातली मळभं दूर होतात. मैत्री थेरपीचा फार फायदा असतो. प्रत्येकजण आपले अनुभव सांगत  आणि  योग्य ते घेऊन नको ते बाजूला सरायचं शिकतो. 
पहिली : आपण सगळ्याच तारेवरची कसरत करत जगतोय सद्धया. हो कि नाही? 
दुसरी : खरंय !
पहिली : तरीपण आपल्या सारख्या काही जणी त्यांना जे जमत नाही त्याबद्दल स्वतः काही करायच्या ऐवजी इतरांवर कुरघोडी करतात असा माझ्या लक्षात आलंय काही दिवसात. 
तिसरी : अगं यात नवल ते काय ? अश्या ढिगांनी असतात आजूबाजूला.  त्यांना ढिगातच राहू द्यायचं सुंदरींनो. 
पहिली : म्हणजे?
दुसरी : हो आणि त्यांना आपण गावभर उधळतो असा पण वाटतं. (हा हा हा हसत ) आणि त्यांना समजत नाही पण त्यांचा चेहरा सगळं सांगतो कि हिला कसं सगळं जमत?  वेळ मिळतो कसा?
पहिली : आवड असली कि मगच सवड मिळते. यावर त्यांना अस ठामपणे म्हणायचं असत कि आम्हाला किती कामं असतं त्यात घरी असतील तर मग काय विचारता!
त्यांना त्या खूप बिझी आहेत हेच सांगायचं असतं. 
तिसरी : असतीलही, सांगावं का लागावं पण?
दुसरी : आपल्यासारखीला जर तो आनंद मिळतो तर खुश व्हावं ना ते नाही. सल दिसते डोळ्यात त्यांच्या कि मला हे मिळालं नाही मी हे करू शकले नाही. 
तिसरी : तेच तर आपण अशा ढीगभर बायकांचा विचार असाच करायचा कि त्यांना आपण सगळं सांभाळून आपला आनंद पण मनमुराद लुटतो तसे जमत नाही म्हणून त्या असा म्हणतात. जाऊ दे. 
पहिली : तेच तर करतो आपण. सोडून देणं...
दुसरी : आपला आनंद बघून आनंदी होतात ती मनं आणि कुत्सित मनं ओळखण्या इतके आपण प्रगल्भ नक्कीच आहोत. 
तिसरी : काही म्हणा बाकी समोर बोलायची हिम्मत नसते त्यांच्यात!
पहिली : आपण आपलं आनंदी जगायचं आणि आनंद वाटायचा. घेणाऱ्याच्या नजरेच आपण ठरवू शकत नाही. 
दुसरी : खूप जणींना सांगता येत नाही कि आपलं जगण नक्की त्यांना आवडत कि कोड वाटत.? काही निर्मळ मनाच्या असतात विचारतात सध्या कुठे दौरा गं  ? काही नुसतं म्हणातात काय ग? इतक्यात कुठं गेली नाहीस वाटतं ? काही म्हणतात तुमचे  फुलपाखरू जगतानाचे फोटो पाहून मन आनंदित होते अश्याच भिरभिरत राहा !
तिसरी : मला एक तर असा अनुभव आहे- "आनंदाच जगणं संसर्गजन्य आहे तो तुम्ही मस्त पसरवता ! मी कधी बोलत नाही पण बघून खूप छान वाटतं. 
पहिली : स्वतःच्या जीवनाचा गाभा समजला कि मग फालतू प्रश्न पडत नाहीत. समोर जे दिसतं त्यातलं चांगलं शोधायची वृत्ती वाढते. मत्सर वाटत नाही आणि मग आपण जे छान पेरतो ना तेच उगवत. 
दुसरी : काही अश्या पण आहेत कि आनंदी जगतात पण जगासमोर दाखवायला घाबरतात. एक तर नजर लागेल हि एक भयानक अंधश्रद्धा मनात असते नाहीतर कशाला गावभर सांगत फिरायचं? असा संकुचित हेतू असतो. 
तिसरी : परिस्थितीने अशी मनं बनतात त्यात चूक मानणं अगदी बरोबर नाही पण तरी ती तुमची बाजू झाली. नका डंका पिटू. इतरांना तर छान म्हणा!
पहिली : मग का चार चौघीत स्वतःला सिद्ध करत फिरावं त्यांनी? मला पण येतं, मी पण करते, मी पण केलं असत पण जमलं नाही, तुला काय घरून सपोर्ट असतो बाई ... हि असली आगाऊ कारण देतात आणि हेवा करत बसतात. 
दुसरी : मग काय तर. आपण आपलं जीव सांभाळून, नैतिक जबाबदारी सांभाळून आनंदी आयुष्य जगायचं जमावतोय. झालेला आनंद स्वतःपुरता न ठेवता  तो पसरवतोय, जेणे करून तो इतरांनी पण घ्यावा. पण नाही... 
तिसरी : आता एकच करायचं कि कुत्सित बोलणाऱ्या सर्वाना मागे सोडून स्मितहास्यानं  पुढं जात राहायचं. वाद घालत बसून वेळ वाया घालवायचा नाही. 
पहिली : हा हा हा !!!!  आणि आनंद साजरा केल्याचे फोटो पाठवत राहायचं. 
दुसरी : कुढायचं कि फुलायचं ते ज्याचं त्यांनीच ठरवायचं !
तिसरी : बरोब्बर! तुम्ही आमचा आनंद बघा नका बघू , आमचे फोटो पहा नका पाहू, आम्हाला छान म्हणा नका म्हणू तो तुमचा प्रॉब्लेम आहे. 
दुसरी : एकंदरच आनंदी जगण या सगळ्या पेक्षा नक्कीच सोप्पय.
पहिली :  ऐका  ना, मस्त सेल्फी घेऊ चला ना, lets capture the moment now, chill babies... update it soon...

आला दिवस आपल्याला आनंद वाटेल तसा जगायचा, अर्थातच नैतिक जबाबदाऱ्या पार पाडत बर का! असं  एकमेकींना सांगत मस्त वडापाव वर ताव मारत तीन फुलपारखं मार्गस्थ झाली, ती पण हलकी होऊनच!
गौरी पाठक 
०७.०४.२०२५
+++++++




**************************
८) 'नजर' ३०.२०.२०२०

पर‌मेश्वरानी दिलेले एक सर्वोत्तम ज्ञानेंद्रीय डोळा, त्याची जरब कळते ती या नजरेतुन!  मनातल्या भावना तंतोतंत भिडतात त्या या नजरेतुनच. आज का वाटलं मला कोण जाणे की नजर या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. मग आठवलं योगेश सोमण सरांचा एक लेखनाचा वर्क शॉप केला होता. त्यात नजरेच महत्व त्यांनी  सहज एका अनुभवाचा दाखला देताना  सांगितला होता. वैशिष्ट्यपूर्ण सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ती गोष्ट अंर्तमनात ठसली.
अचानक काही दिवस कामाला जाताना एका ठराविक सिग्ननलला सत्तरीतले एक भिकारी गृहस्थ थांबलेल्या वाहनांपुढे हात पसरवताना दिसु लागले.
रोजचे ते आजोबा जसे मला पाठ झाले होते, तसे मी त्यांना पाठ होणे शक्य नव्हतं - ते मास्क, स्कार्फ आणि हेल्मेटमुळे. पेहरावामुळे खरतर तर ते भिकारी अजिबात वाटत नव्हते. त्यांच्या कृतीमुळे ते भिकारी आहे याची खूण पटवून देत होते. पांढरा स्वच्छ झब्बा, धोतर, पंचा डोक्यावर गुंडाळलेला हातात स्वच्छ काठी, दणकट चपला सुस्थितीतला चष्मा म्हणजे मुळातला टापटीपीचा माणुस असावा असाच तो होता.
जवळ जवळ पंधरा दिवस रोज सिग्नला ते आजोबा दिसू लागले. मनात विचार आला की - वाटत तर भिकारी नाहीत, हे मग काय असे घडले असेल यांच्या आयुष्यात की यांना हिनदिनपणे हात पसरावे लागत असावेत. सिग्नल सुटला विचार खुंटला.
एक दिवस सिग्नलजवळ मी व अजुन एक टूव्हीलर दोनच गाड्या होत्या. आजोबा त्यामानाने बरेच जवळ आले, हात पसरले, हिनदीन पणे हात हलवु लागले. भुकेची तमा अशी खुण समजावी. पण आज काठी नव्हती आणि एकदम अचानक नजर चमकली माझी. अंतर्मनातून सोमण सरांनी नजरेच उदाहरण दिलेला किस्सा आठवला. तडक तो सल्ला अमलात आणला गेला. चेहऱ्याचे हावभाव न बदतता का अस वागताय आजोबा ? या भावनापूर्ण डोळ्यांनी मी न डगमगता थेट आजोबांचे डोळे गाठले. भुरकट पिवळसर झाक असलेले डोळे त्यांचे- भिरभिरू लागले. मला त्यांना जाब अजिबात विचारायचा नव्हता परंतु माझे डोळे त्यांच्या कृतीच काय कारण असेल? याचा शोध घेऊ लागले होते.
त्यांना ते काही क्षणात जाणवलं. भिरभिरती नजर खाली जाऊ लागली. अजुनही काही हालचाल न करता मी थेट त्यांचे डोळेच तपासत होते. काही क्षणात् त्यांचे पसरणारे हात शांतम पापम् सारखे गालाला लावले गेले. त्यांनी नजर चुकवत ईतरत्र पाहण्यास सुरुवात केली. त्यांचं नजरेला नजर भिडवू शकणं कमी पडु लागलं होतं. त्यांनी परत माझ्याकडे बघितलं आणि शेजारच्या गाडीसमोर बघुन झपकन माझ्याकडे पाहिलं. खरतर मी काहीच केलं नव्हतं पण बरच काही डोळे करून गेले होते. ठणठणीत प्रकृती स्वच्छ कपडे घालणारा माणूस भिक का मागत असेल? एवढाच प्रश्न मला होता. कोणीच कोणाला बांधिल नव्हतं - ते उत्तर द्यायला आणि मी त्यांना जाब विचारायला. माझ्या डोळ्यातून आजोबांना तो प्रश्न कळवा असावा कारण त्यांची देहबोली अचानक गोंधळुन गेलेली मला जाणवत होती. 
शेजारच्या टु व्हीलर जवळ हात न पसरता आजोबा मान नकारात्मक हलवत फुटपाथवर चालत जाताना मी बघितले. सिग्नल सुटला. न बोलता माझा त्यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यांनी न बोलता तेवढ्यापुरत का असेना निघुन जाताना तो समजल्याची पावती दिलीच. ती पण नजरेतून!
पुढे दोन आठवडे तो सिग्नलवर दिसलेच नाहीत. परत येणार नाहीत वगैरे ठाऊक नाही  पण मला हे समजले की आपण पडणारे प्रश्न फक्त त्या भावनेने पाहुन विचारू शकतो. जो चुकत असेल पण (काही कारणाने का होईना त्याला बोलूनच व्यकत होऊन जाब विचारण) अथवा अन्यायाला सहन करणे हे फक्त नजरेतूनही होऊ शकते. काही वेळा शब्द गरजेचे नसतात. प्रत्येक वेळी तीव्र भावनेची कृती गरजेची असते 'नजर' माणसांना डायरेक्ट हृदयाची भाषा पोचवते. सरांनी सांगितलेल उदाहरण आज अनुभवले. भिकारी आजोबांची दुसरी बाजु कशी का असेना? त्यात मला फार पडायच नाही पण त्यांची कृती, तो मार्ग योग्य वाटला नाही हे त्यांना नजरेतून पोचलं.
सोमण सरांनी आज मला एक नजर दिली. शब्दानी घायाळ न करता नजरेची भाषा आपण कधी वापरायची हे समजलं.
सोमण सरांचा अनुभव ऐकला होता आज तो बरच सांगुन गेला शिकवुन गेला.
धन्यवाद!
सौ. गौरी पाठक
*********
७) गुजगोष्टी. 
(२३.०२.२०१४)

नुकताच प्रेम दिवस म्हणजेच व्हेलेंटाइन के होऊन गेला. बरेच छान छान लेख वर्तमान पत्रात आले. तो साजरा करावा का नाही यावर नेहमी प्रमाणे चर्चा वाचली. तेव्हा मनात विचार आला प्रेम हे इतर दिवशी पण असत त्यासाठी एक दिवस कशाला हवा? पण माझ्या मते जगात विविध रुपात विविध नात्यात प्रेम असते. ते व्यकत करण्यासाठी एक दिवस पाश्चात्य देशात साजरा करतात तो आपणही का करू नये. हरकत नाही. पण जसे बर्गरला आपलसं कराल तसं आपल्या वडापावला  इतरांना  करायला सांगा. 

कोणतेही राष्ट्र कोणतीही संस्था, धर्म यामध्ये जर घेण्यासारखं असेल तर का घेवू नये. परंतु त्याचा अतिरेक मात्र होता कामा नये. त्यामागची भावना स्वच्छ, निर्मळ सुंदर असली पाहिजे, तसेच आपल्या संस्कृतीचे पण सण उत्सव जे पूर्वापार चालत आले आहेत ते चालु ठेवले पाहिजेत. ते पण ईतरांना महत्वासकट समजवुन सांगता आलं पाहिजे. त्याचं भान आजकाल राहिलेले नाही. परदेशी साजरे होणारे दिवस साजरे करावेतच पण मंगळागौरी, वटसावित्ती, घरात चालत आहेत ते कुळकुळाचार याचा पण विसर पड्डू देवू नये. आजकाल पॅंट सर्वत्र सहज घालून मुली वावरतात पण साडी घालता येत नाही आणि सांभाळता त्याहून नाही. माझ्यामते बर्गरला जवळ करावं पण वडापावला  विसरू नये. आपली संस्कृती पण पाळा.  हेच आजकाल जर परदेशी युवती पाहाल  तर साधी काय नऊवार पण नेसून चक्क गणपतीच्या मिरवणुकीत दिसतात आणि आपण गणपती पाहायला पॅंटमध्ये.

 माझा मुद्दा सतत साडी नेसावी असा नाही. अथवा सतत देवासमोर बसा असाही नाही. पण जे समाधान घरातली पुजा, घरातल्या लोकांच समाधान सांभाळून हे आपले सांस्कृतीक दिवस साजरे करण्यात आहे ते कशातच नाही. स्वतःचा धर्म संस्कृती उत्तम सांभाळून इत्तरांची आत्मसात करण्याचे पाहावे असे एकच म्हणणे आहे.  सगळं करावं, गुडीपाडवा सणाचा आनंद घ्यावाच , हौस तसेच जरा विरंगुळा म्हणून ३१ डिसेम्बर पण  साजरा करावा. 

"काय गं झालं का तुझं संक्रांतीच हळदीकुंक?"  "छे! छे। मी कधीच नाही करत." हे म्हणणारी युवती फ्रेंडशीप डे व्हॅलेंटाईन डे ला मात्र सगळ्यात आधी हातात गुलाब घेवून फिरताना दिसेल. मैत्री दिवस प्रेम दिवस  साजरा करावा. काही वेळा जवळच्या प्रेमाच्या व्यक्तिलाच बरेचदा भावना सांगायच्या राहून जाऊ शकतात. या दिवसानिमित्त नुसता मित्र असणारा उत्तम मित्र होवू शकतो.

परंतु त्याच बरोबर हळदीकुंकु करणे ही आपली संस्कृती आहे. (हे एक फक्त ऊदाहरण आहे.) पूर्वजांनी काहीतरी विचार करून पद्‌धती सुरु केल्या असतील. त्याला पण मान दिला पाहिजे. अस जर झालं तर सर्वत्र उत्तमच होईल असा माझा विश्वास आहे.

दुसयांची संस्कृती नक्कीच आत्मसाद करा पण स्वतःची न विसरता !

सौ. गौरी पाठक
१४.०२.२०२५
ता.क.

माझ्या मताशी सर्वजण सहमत असतील असे नाही. पण विचार नक्की करा. एखाद्या विधानामुळे नकळत कोणाच्या भावना दुखावत्या असतील
तर क्षमस्व ।
*****
६) नक्की चुकतंय कुठं?

चला तुळशीच लग्न झालं काल मस्त. आता लग्न सराई सुरू असा विचार करतच होते, तर जुन्या एका मैत्रिणीने मुलीच्या लग्नाचा मुहूर्त करायचाय म्हणून बोलवलं. मस्तच ना!  मी गेले मुहूर्त फक्कड झाला. विविध ग्रुपच्या मैत्रिणी तीनं बोलवल्या होत्या. अनेक ओळखी झाल्या आणि फराळ करताना या पिढीला दिलेली मुभा यावर विविध अंगी चर्चा झाली ती अशी-

चिंगी : आजकाल लग्नाला हो म्हणायला खुप ऊशिरा करतात मुलं.

पिंगी : अग हो पण नोकरी शिवाय कस हो म्हणतील आणि शिक्षणच किती लांबलचक झालय.

मिंगी : सगळ नीट होईपर्यंत काळजीच वाटते हल्ली बिभत्स झालय सगळं.

टिंगी : रेप काय आणि लग्नानंतर आणि आधीची अफेअर्स काय! विवाहसंस्थेचा पायाच यात डगमगलाय.

फिंगी : खरय ग... यात आपलं लेकरू नीट असेल पण संगतीच कस कंन्ट्लोल करणार आपण. सगळ्या माता भगिनी समान तराजुत आहेत.

पिंगी : २००% बरोबर हे टेन्शन मी अनुभवलय.

चिंगी : ठराविक वयात पालक होण्यात निसर्ग साथ देतो तेव्हा ही पिढी म्हणजे मुलं मुली दोन्ही बरका पदवीधारकीच्याच उंबरठ्यावर असतात. मग चुकतय कुठं? असा प्रश्न पडतो.

मिंगी : एकनिष्ठ राहणं हा विवाहसंस्थेचा गाभाच यांना पटत नाही हल्ली. ऐच्छिक आहे ते म्हणे. काय तर तो माझा / आमचा वैयक्तिक अधिकार आहे. डोंबल...

टिंगी : अशाच ऐच्छिक अधिकाराच्या गोष्टींमुळे बिभत्सता वाढते त्यात सहज उपलब्ध असणारी दुरदर्शन तत्सम ऊपकरणं घरबसल्या  बघायला आहेतच.

पिंगी : हे मात्र पटल बघ... काय काय सिनेमे असतात अररर .. "शील" नावाची गोष्ट विसरतेय ही पिढी आधुनिकतेच्या नादात.

मिंगी : आकर्षण आणि प्रेम भावनांचा गदारोळ झालाय. चिंगी चा प्रश्न खरोखरच तगडा आहे. पण हा प्रश्न आहे असं याना वाटतच नाही. 

चिंगी : मला मान्य आहे की विवाहसंस्था होती तरी बिभत्सवृत्ती होती, नव्हती अस नाही पण तीला धाक होता.

मिंगी : हो, धाक होता, मर्यादा आणि शब्दाला किंमत होती. पण येईल लवकरच ही वेळ यांना समजण्याची असच म्हणुया.

पिंगी : चुकतय कुठं मग? असा प्रश्न सुटेल हळूहळू. अस म्हणुया. एकंदर आपण जे बोललो ते ऐकून वाटतय की चुक कोणा एका व्यक्तीची किंवा पिढीची नाही. तर ती परिवर्तनाची म्हणायला हरकत नाही. ऊंच शिखर गाठुन आपटुन लाट जशी ऊभी राहते तसच येईलच नक्की परिवर्तन विचारात. बघु.

चिंगी : let's keep our fingers crossed. 

पिंगी : आपण फक्त आपल्यापरीने या पिढीला जपायचं. शिकवत राहायचं. त्यांच्या गरजेला ऊभं राहायचं.
तेवढ्यात लेक (होणारी नवरी) आली "आई झाल ना सगळं सोडु का साडी?"

फिंगी : खळखळाट हसत.. "घ्या! तासभरात कंटाळली साडीला"

अशाप्रकारे आम्ही भानावर आलो आणि  नक्की चुकतय कुठं? विचारा ऐवजी  आत्तातरी आपली जबाबदारी काय हे मनाशी घोकत आणि रिटर्न गीफ्ट आवडल्याच्या आनंदात बाहेर पडलो.

सौ. गौरी 
१५.११.२०२४
*****
५) चेपलेली मधली फळी

अगदी अचानक वन डे पिकनीक ठरली. दोन समविचारी जोडया पण तयार झाल्या. वयाच अंतर (पाच- दहा वर्ष) असलं तरी मनाच नसल्याने फार छान दिवस गेला. पिकनीक स्पाॅटवर एक कुटुंब सहपरिवार (कुत्रं पण बरं का!) दिसलं आणि कुत्रं घरात असावं का असा विषय निघाला. 

एक : कुत्रं असण आजकाल फॅमिली चा चौथा मेंबरच झालय.

दोन : हो ना! घरात वयस्क नसतील पण कुत्री मांजरी असतीलच. असच चित्र सगळीकडे आहे.

तीन : सगळेच वयस्क सारखे नसतात. माझा अनुभव आहे की काही वरिष्ठांना त्यांच्या चाकोरीबद्ध जीवनात ढवळाढवळ नको असते म्हणून ते नसतात. अश्यात घरातल्या एकाच मुलाला / मुलीला आपलं म्हणुन जीव लावला जातो ते मुक्या प्राण्यामुळेच की.

चार : सगळ्या बाबतीत अपवाद आहेतच....  असे बरेच वयस्क बघितलेत की राहतात पण हक्क वसुली असते तुम्ही मुलं आहात आमच केलच पाहिजे. खुप कमी जणं सुनेला मुलगी समजुन राहतात. 

एक : आपली पिढी खरच चेपलेली मधली फळीच आहे. आधीच्या पिढीला धरून ठेवावं मन सांगतं कारण ते संस्कार मनावर लहानपणी झालेत तसच पुढच्या पिढीला सोडून पण द्यावं लागतं कारण त्यांनाच बघत पुढच आयुष्य आनंदात घालवायचय!

दोन : आपल्या पिढीलाच ही चेपी का पण? विचार करण्याची गोष्ट आहे.

तीन : अस ठरवुन नाही ते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपण तो कसा घेतो यावर ते आहे.

चार : हो खरय पण सुनेचे वडिल ८० वयात काम करतात पण सासरे चालते फिरते असुनही मुलाला पायदुखी सांगुन त्रस्त करतात. एकाच कौतुक आणि ठणठणीत आहेत म्हणून एकाला गृहित का धरायच?  असं नसावं ना पण मग. 

दोन : अस नसतं माझ्या मते वय सेम असल तरी शारीरिक फरक असू शकतोच. हे थोड वेगळ वाटलं.

एक : अस असत बरेचदा आधीच्या पिढीला आजही कोणाच्या ही माहेरचे तुच्छच अशी भावना असतेच हे पण असच फरक समजुनच म्हणायचं का? मग हाच फळी चेपीचा मुद्दा आहे. अस म्हणायला हरकत नाही.

पाच : हो मला असच वाटतं. यात आणखी एक आहे की एकत्र राहणारे आणि विभक्त राहणारे..

एक : दोन्ही मधे प्रत्येकाची बाजु असेलच पण खापर फोडणारे मला आवडत नाहीत. उदाहरणार्थ घरी सासु आहे म्हणून जमल सगळं तुम्हाला... परंतु ती नसणारे पण जमवतात की सगळं. आताच्या साठीतल्यांना हा ईशु जास्त आहे कारण ते हम दो हमारे दो मधले आहेत जास्त करून.

सहा : खरय आताचे पन्नाशीतले साधारण एकच बास मधले आहेत. तर पालक गावीच राहण पसंत करणारे असतात. एकंदर काय परिस्थिती कोणतीही असो प्रश्न असणारच आहेत.

पाच : आपली पिढी चेपलीय खरय पण आपण चेपलोय अशी भावना न ठेवता जगायचा प्रयत्न करायचा.
मी ठरवलय घरातील वरिष्ठांना त्यांच्याच चौकटीत ठेऊन आपण आपलं जेवढं जमेल तेवढं जग अनुभवुन घ्यायचं ते पण कनिष्ठ पिढीला चौकटीत हलकीशी मुभा देऊन. 

सहा : यात एक करायच सतत "जग गेल चुलीत" म्हणजे कोण काय म्हणेल का? ईकडं लक्ष न देता दुर्लक्षायनम: म्हणायच! 

एक : आयडिया भारीय. गरजेच्या ऊपस्थितीत चौकटी फिट. 

दोन : खरय यामुळे आता परत गरजेची वाटणाऱ्या  (किंवा वाढीस लागणाऱ्या ) अशा  हम दो हमारे दो पद्धतीला सहकार्य दिलं जाईल आणि धर्मही टिकेल. समाज संस्था भक्कम राहिली की विश्व स्थिरावेल आनंदेल.

चार : आनंदी राहायचं आता आपल्याला महत्वाचं आहे. घराचे लोन, शिक्षणाचे लोन, इतर जबाबदारीतून जरा फील घेऊया निवृत्तीचा. हो फील  म्हटलंय मी कारण आपली पिढी   कधीही निवृत्त होणे नाही. 

एक : असाच भेटत राहून मन हलकं करायचं आणि कर्तव्याला उभं राहायचं ! हेच या सर्व प्रश्नांना उत्तर.... 

चार : हा हा हा!!! चला आवरा निघु या आणि हो त्या कुत्र्याचे आभार माना!

(हशा पिकला खरा पण सहा मनं हलकी होऊन ऊडतच निघाली म्हणायला हरकत नाही.)

सौ. गौरी पाठक 
१२. ११. २०२४



*********
४) कंपन

काल ट्रेनमधुन येताना अचानक चार मैत्रिणी झाल्या.  छान वाटत अस अचानक भेटी झाल्या की. त्यातली एकच आधीची शाळेतली मैत्रिण निघाली. बाकी सहप्रवासी च होतो. पण मनमोकळ्या असल्यान ओळखी केल्या गेल्या. पण फारशी  एकमेकींची मत ठाऊक नव्हती. तीन परिवारच होतो. 

सगळ्या जणी वयाच्या पाच वेगळ्या वयोगटातल्या होतो.  मस्त पुण नागपुर गप्पांचा बेत रंगत होता. मंदा, संध्या, कुंदा, नंदा आणि मी. मंदाच्या लेकीच नाव वधुवर सुचक मधे नोंदवल अस तीनं सांगितलं. तिकडून विषयाला सुरुवात झाली.

मंदा : आणखी कोणती संस्था आहे का गं नावनोंदणीची?

संध्या : मला तरी कल्पना नाही. अजुन तरी मला वेळ यायचीय, आम्ही आत्ता दहावीची पायरी चढतोय.

कुंदा : आम्ही ऊतरलो यंदा या पायरीवरून. हुश्श!

नंदा : आहेत संस्था पण "माहेर" संस्थाच जास्त  खात्रीची आहे.

मी : माझ्या मैत्रिणीला विचारेन, तीनं नुकतच मुलीच नाव नोंदवल आहे. ती सांगत होती की आधीपेक्षा चार पाच मुद्दे जास्तीचे नोंदणीत लागतात. जे असतील अस आजवर वाटलं नव्हतं.

मंदा : हो आणि विषेश म्हणजे वय वर्ष २५  असल तरच नोंदवा म्हणतात. हल्ली २९-३० शिवाय लग्न करतच नाही कोणी.

कुंदा : सत्य परिस्थिती आहे मी अनुभवलेल सांगते. माझ्या नात्यातल एक लग्न (लवकर ठरवलेल बरका?) म्हणजे २४-२५ वय साधारण, स्थळ ओळखीतला मुलगा म्हणुन चौकशीला आले.  समोर दिसतो रोज, वागणं बोलणं छान आहे म्हणुन म्हटलं आम्ही‌ छान आहे मुलगा. जवळ जवळ मध्यस्थच झालो.  सहा महिन्यात भांडणं घेऊन आले पालक बघा जरा समजवुन म्हणतं.

काय समजवायचं या पिढीला? थोड तुझं थोड माझं ची तयारीच नाही. कस बसं निभलय आत्ता. पण आधीसारखं जगात नाही राहिलं.

संध्या : मला तर हल्ली वाटतं की लिव्ह ईन मधे राहुन पटल तरच करावं लग्न.
नुसत स्थळ बघुन समजणं अशक्य आहे, कोणाची खात्रीच ऊरलेली नाही.

मंदा : अस काही गरजेच नाही कारण शिक्षण ते नोकरी पाच वर्षांत जवळजवळ सहवासातच असतात ही मुलं. बघ की विचार कर भटकंतीच जास्त असते. नाईट आऊट, लेट नाइट पार्टी बघता किरकोळ तासच घरी असतात की. त्याला लिव्ह ईन कशाला हवय? 
आणि काही खात्री नाही लिव्ह ईन नंतर पण घटस्फोट होणार नाही काय खात्री?

मी : खरय तुझं. पूर्वजांनी विवाह संस्था नियोजनबद्ध जीवनासाठीच आखली असणार ते चुकीच कस होईल. काही तरी विचार करूनच सोळा संस्कारात आहे ना लग्न घटक.

नंदा : दोघांच्या समजुन घेण्याच्या क्षमतेवरच टिकत लग्न. नाहीतर पाच वर्षानंतर पण चांगला संसार करून लग्न मोडलेली ऊदाहरणं आहेत.

कुंदा : कोणीच परिपूर्ण नसत हे समजुन जगणं आपल्या पिढीपर्यंत समजलय. पुढच अवघड आहे.

मंदा : पण अशातही घरच्यांनी स्थळ पहा असच होतय. आपापल बघुन आणलय हे हळूहळू कमी होतय म्हणजे आत्ता एक टक्का म्हणु.

संध्या :  पण कायद्यान पण हो म्हटलय लिव्ह ईन ला.

मी : लग्न करून नंतर समजुन घ्या वर्षभरात. आधीची पिढी अशीच जगली आणि ती आनंदी आहे. कायदा आला म्हणुन पाळाच अस नसावं गं.

नंदा : खरय आत्ताच वेळ आहे संस्कृती जपण्याची या पिढीला शेवटचा चान्सच जणू.

मी : हो ग अगदी खरं. आत्ता सकारात्मक विचार करण्याची गोष्ट मंदानी म्हटल ती ही आहे की ते एक प्रमाणाचा टक्का वाढेल हळूहळू असच म्हणुया. 

पण जोडीदार स्वसंमतीन असला की तो आपल्या घरात, आपल्या मनात हक्कान ठाम ऊभा राहतो. काळ कोणताही असो मानसिक भक्कम आधार वाटतो. हीच तर शिकवण दिलीय पूर्वजांनी विवाहसंस्थे विषयी.

संध्या : हं... नि:शब्द ..

मंदा कुंदा नंदा मी : विचारात....

अचानक ब्रेक लागला, गपकन गाडी कुईईई आवाज करत थांबली. दौंड आलं होतं. आमच्या चर्चेला पण ब्रेक लागला कारण वाफाळता चहा घेऊन दादा आले.
मजा आली पण गप्पा मारताना.

 एक छान झाल नवख्या होतो सगळ्या मनातल बोलल तरी गेलं. मनातली कंपन लहरी बाहेर पडल्या, जगातली परिस्थिती समजली. मग पाचही जणींनी सेल्फी काढला. शास्त्रं असतं ते. 

झाल की मग कुठ पोचली गाडी फोन सुरू... बॅक टु करंट पोझिशन...
 मग काय तर... आयुष्यात येणारं सगळ सकारात्मकपणे झेलायला तयार झालो आणि ते पण कंपनरहित!

सौ. गौरी पाठक
२६.०८.२०२४
********
३) कंगोरे

नेहमी पाऊणतासात घरी पोचते मी. कधी कधी मधे काम करून तासाभरात जास्तीत जास्त.  नोकरी करत असल तरी घरची ओढ मला नेहमीच वाटते. 

आज घराजवळ एक मैत्रीण भेटली, खर तर रोज दिसते ती. घड्याळं असतात आयुष्यात काही लोकं. ऑफिसला जाताना - येताना दिसली नाही ही मंडळी की समजायच आज ऊशिर झाला आहे.

पण आज मनापासून वाटल थांबुन बोलुच.  ती पण थांबली. दोनच वर्ष झाली दोस्तीला, पण छान वाटत तीला भेटुन. डोक्यात मधुरिमाला लेख पाठवलेला विषय होताच. 

मी : कशी आहे लेक?
ती : मस्त! हल्लीच्या मुली पटकन सेट होतात.
मी : करमत का ग?
ती : आता हळूहळू सवय होतेय. पण फोन मुळे हव तेव्हा बोलण होतं. तीला हव ते ती विचारते. सुरूय..
मी : मस्त. हे मी माझ्या मैत्रिणीला सांगणार आहे. तीचा लेक परप्रांतीय सुन आणतोय. ती खुप हौशी आणि कायम आनंदी पण पुढच सगळ कस जमेल विचारात आहे. 
ती : परप्रांतीयांना पण आपली संस्कृती खुप आवडते. तीला सांग की योगायोगानं श्रावण आहेच, सगळे सण व्रत समजवत करत रहा.
मी : मग काय तर. मी म्हटलच कर तिकडेच केळवण, जिवतीची पुजा घरच्या घरी जमतय तसं.
ती :  आपल्याला वाटत पण आपण करत राहिलेल मुलांच्या मनात नोंद होत असतं. ही बघ की ईकड बघायची पण एकटी परदेशात आहे तर सगळं पाळते. अगदी रामनवमी अयोध्या देवळाच्या दिवशीच पण भारतासारख तिकडे चार पाच का होईना जमुन केलं.
मी : ( मनात... आजच लेख पुरा केला तो आशय वास्तविक दिसतोय समोर... मनभावन सावन वाचा लेख माझा. त्या दिवशीच तो फायनल करून पाठवला होता.) मला हेच वाटत आपण करत राहायच.  शिकवत राहायच. आपण सांगितल नाही अस व्हायला नको.
ती : अगं अनुभव हा आहे की परप्रांतीय मुली पण आजकाल आपणहून सगळ हौशीन करू लागल्या आहेत. आनंद आपल्यातल्याच मुलींचा आहे. पण वेळ आली की करतात हा पण अनुभव आहे. 
मी : हेच म्हणते मी की, या पिढीतल्यांची शिक्षणाची वर्ष वाढली, अपेक्षा वाढल्या, प्रलोभनं वाढली, कर्तव्याची व्याख्या बदलली. त्यांना अनुभव येण्याच्या वयात अंतर वाढलं. तरी संस्कृती संस्कार कानावर पडतच ठेवले की ते कधी ना कधी ऊमजतीलच.
ती : खरय! आपल्या पिढीनं  करत राहायच आणि आनंदी राहायच.
मी : महत्वाच म्हणजे  या पिढीला जेव्हा खरी गरज असेल जे त्यांच्या आत्ता लक्षात येत नाहीये, तेव्हा काहीही झालं तरी मदत करायची. ती कोणतीही असू शकेल. सांस्कृतिक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा.
ती : प्रश्नच नाही ग. आपलीच लेकरं ती. तसही पिढीत बदल होऊन होऊन असा काय होईल? परत जुन्या फुग्याच्या बाह्यांची फॅशन आलीच ना! तसच होईल.
मी : खळखळाट हसत.... हो तेव्हा आपण आजी गटात मोडू मग नातवंडं येतील, आईला काही माहितीच नसतं ...आजीलाच विचारू.
ती : भन्नाट 
मी : पळा घरी, अंधार पडला की..
ती : नंतर काय झाल सांग ग. मी पण पळते.

अशा प्रकारे गप्पा दिड तास झाल्या. घरी पोचायला साडे आठ. पण न ठरवता झालेल्या गप्पांमध्ये मजा आली. खुप कंगोरे बोलायचे राहुन गेले खरे पण मन हलकं झालं. गपचुप आईंनी केलेलं जेवले. 

सौ. गौरी पाठक
२३.०८.२०२४
***********************
२) वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ

काल एकीच्या घरी भिशी होती. योगायोगानं आणखी दोघी तिघी पण भेटल्या. मस्त सात आठ जणी खूप दिवसांनी भेटू शकलो. 
नुकताच कोरोना गेलेला त्यामुळे भेटी गाठी परत सुरु झाल्या. त्यामुळे खूप खूप बोलायचं होतं सगळ्यांनाच. 

 *एक म्हणाली :* हा घरून काम करतोय अजूनही त्यामुळे मुलाला सोडणे आणणे बाहेरची काम पण करायला मदत होतेय पण माझं बाहेर जाणंच होत नाहीये त्यामुळे. (दु:खी  चेहरा) त्याला कामात ब्रेक असेल तेव्हा हाच म्हणतो हे मी करून येतो, ते मी करतो. माझ रूटीनच बदलुन गेलय.

 *दुसरी म्हणते :* बरय कि तेवढंच तुला निवांतपणा. (पण तिला तो निवांतपणा नको होता असा बोलण्यातून जाणवलं.)

 *तिसरी म्हणाली :* मग तू पण काहीतरी आवडीचं काम सुरु कर कि तसही तू पण आधी काम करताच होतीस कि. (पण हे बोललेलं  पण तिला आवडला नाही. )

 *पहिली  :* करायची तेव्हा केली कि कामं, (रागवून) नोकरी केली म्हणजेच  सगळं असत असा नाही. घरी असणारी स्त्री पण कमी काम करत नाही. 

 *तिसरी :* अग तूच तर म्हटलंस ना कि नवरा घरून काम करतो त्यातून ब्रेक असेल तेव्हा तोच बाहेरची बरीच काम करतो तुला तुझं बाहेर जाणं भेटणं इतर होत नाही. म्हणून मी म्हटलं.

घर सांभाळताना पण तर तू खुश नाही असाच अर्थ झाला ना म्हणजे. घर सांभाळणारी आणि नोकरी करून घर सांभाळणारी दोन्हीही तितक्याच महत्वाचं आहेत हे मला पण ठाऊक आहे. पण आपण ज्यात आहोत म्हणजे नोकरीच्या किंवा घर सांभाळणाऱ्या यात समाधानी असं महत्वाचं आहे. 

 *पहिली :* नोकरीच्या बायकांना नेहेमीच त्या ग्रेट वाटतात. (कुत्सित)

 *चौथी :* असा समज चुकीचा आहे. आपणच आपलं ठरवतो. नाही एखादीला अधिपत्या खाली काम करायला आवडत ती नाही करू शकत नोकरी. याचा अर्थ नोकरीच्या स्त्रियां बद्दल असा विचार नसावा. तू तर दोन्ही स्त्रीचे आयुष्य जगली आहेस ना !

 *पाचवी :* बरोबर.

 *तिसरी :* तेच म्हणायचं होतं मला कि असा कोणत्याच स्त्रीने मग - ती नोकरीची असो व घर सांभाळणारी, दुसरी बद्दल विचार करायला नको. 
तसही अपवाद असतीलच कि म्हणजे घरी राहणारी स्त्री पण अधिपत्याखालीच असत नाही अस नाही आणि नोकरीवालीला विचारणारं कोण नसेल असही नाही.

समाजात आपलं अस्तित्व टिकवून परंपरेने असलेले सगळे करून नवीन पिढी घडवणं हे सर्व स्त्रियांचं काम आहे ते करताना जिला जो मार्ग सोपा वाटतो तो ती निवडते. (हे काम करण्याची क्षमता स्त्रीयांमधेच असते. यावर दुमत नसावं.)

 *दुसरी :* खूप शिकलेल्या स्त्रिया पण घर सांभाळतात तसेच कमी शिकूनही नोकरी करून घर  सांभाळणारी पण असतेच की.

 *पहिली :* पण समाजात घर सांभाळणारी कमी लेखतात. 

 *तिसरी :* असं कोण म्हणतं ? ज्याची त्याची क्षमता असते ती. त्यात महत्वाचं म्हणजे कमी लेखतात हा विचार का करायचा. हा विचार करूनच मन दूषित करतो आपण. 

 *पाचवी :* दोन्ही प्रकारच्या स्त्रियांनी एकमेकींना तितकीच किंमत दिली पाहिजे. 

 *तिसरी :* सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखण आधी बंद करा. 

 *पहिली :* म्हणायला सोप्पंय ग, पण अनुभव येतात ना तसे. 

 *तिसरी :* दुर्लक्ष करायचं मग. ते आपोआपच बंद होतं.  मी पण इकडून बाहेर पडताना या वाक्यावर दुर्लक्ष  करणार आहे ते हे :  "नोकरीच्या बायका स्वतःला फार शहाण्या समजतात."

 इकडे बोलले कारण मी तुम्हाला आपलं समजते. आपणच आपल्या सख्यांचं मन स्वच्छ ठेवायला मदत करायची मग मैत्रिणी का म्हणून घ्यायचं एकमेकींना?

 *चौथी  :* एकदम बरोब्बर !

 *पहिली :* हं... प्रयत्न करेन ... दुर्लक्ष करण्याचा.. 

 *सहावी  :* बरोब्बर ! मी तेच करते. असले टोचणारे विषय आले कि शांत बसते. मी पण या दोन्ही स्त्रिया जगले आहे. जे जमत नाही त्या बद्दलची रुखरुख कमी होते अशानी. उभारी येते ती वेगळीच. 

 *तिसरी :* ज्या प्रकारचे जगायचे आहे ती काळाची गरज पण असू शकते. सगळंच मनाप्रमाणे करता येतेच असे नाही. आत्ता सर्वात महत्वाचे हे कि जे करू ते आनंदात राहून करूया. आपल्या शरीराला त्याची गरज आहे. मग ती नोकरीची स्त्री असो व घर सांभाळणारी. एकमेकींवर डागण्या डागण्यापेक्षा मिळून उपाय शोधू ,समजून घेऊ, उभारी देऊ. 

 *सगळ्या :* १००% खरय ग !

 *सातवी :* हं ! (कशातच मत न देणार व्यक्तिमत्व )
००----------००

गौरी पाठक 
२१.०८.२०२४


अभिप्राय 


***********************
१) नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.

आज काल समोर चुका सांगितल्या तर त्या समजत तरी नाहीत किंवा त्या चुका वाटत पण नाहीत किंवा त्यांना त्यात पडायचं पण नसतं - हो आपण बरं आणि आपलं घर बरं असा दृष्टिकोन असतो बरेच जणांचा. 

पण धकाधकीच्या या जीवनात काल असे दोन किस्से घडले कि मनावर हळुवार फुंकर घातली गेली.  जणू काही कान्हाजीनी सुचवलं कि दूरवर पाहायला शिक न समजणारी लोकं, तस वागताना निबर जगणारी माणसे  विसरून जायला शिक. 

काल मी माझा आवडता गर्द हिरवा पंजाबी ड्रेस घातला होता. दिवस खूप छान सुरु झाला होता. कामावर पण नेहमीप्रमाणेच वेळेत निघाले होते. माझी रुपेरी ज्युपिटर आणि मी सिग्नल ला उभे होतो. उजवीकडे एक सोज्वळ पंचविशीतली मुलगी पण मागून आली. डावीकडे फटफटीवर कानात हेडफोन घालून त्रासात चिंतेत असलेले तरुण मुलगा होता. जगाचं भानच त्याला नव्हतं. त्याच्या अगदी जवळ बस आली आणि क्षणात सिग्नल तोंडाला बसनी. ती बस त्याच्या इतक्या जवळून गेली कि उजवीकडचे आम्ही सगळे आता काय होतंय याच ?? असच बघत डोळे मोट्ठे करून आं वासून होतो. मोठा सुस्कारा सोडत सगळे काय बसवाला आहे ? कशी नेली गाडी देवा रे! असे बोलत होतो. यात तो मात्र अनभिज्ञ होता. शेजारची आणि मी बोललो काय मुलगा आहे हा.... काय बेतलं होतं आज याच्यावर याची काहीच कल्पना नाही याला. तरी याचे वादाचे हो हो तसे नाही असेच सुरु होते. इतक्यात उजवीकडची मुलगी मला म्हटली कि तुमचा ड्रेस खूपच मस्त आहे ताई. आश्चर्याने मी झपकन खाली बघितलं कि कोणता ड्रेस आज घातलाय ते. ती म्हणाली कि पॅटर्न पण मस्त शिवलाय तुम्ही. मी धन्यवाद म्हटलं. दोघी पण खूप छान हसलो. या पाच सात मिनिटात इतका काही शिकवलं कान्हाजीनी काय सांगू.  टाटा करत सिग्नल सुटल्यावर आम्ही पुढे गेलो. 

दोन चौक झाल्यावर एक अनारकली घेराचा ड्रेस घातलेली मुलगी माझ्या पुढे मला दिसली. मी माझ्याच विचारात होते. वीस बावीस वर्ष कामावर जातानाचा रास्ता पाठ होऊन जातो. आपोआपच आपण पोचतो. इतकयात माझ्या लक्षात आलं कि तिचा ड्रेसचा घेर चाकात जाणार आहे. ती खूप घाईत दिसली. मी मागून खूप हॉर्न वाजवला. काही क्षणात तिला ते  समजलं. मी हेल्मेटमधून डोळे गाडीच्या खाली बघ असे निदर्शनास आणून दिले. तिनीपण मन हलवून समजल्याची खूण पटवली. तत्क्षणी तो फलकार सावरत परत गाडीच्या आरशातून मला डोळ्यांनी भुवयांच्या ओके आहे ना? असा विचारलं. मी पण पटकन मान डोलावली. त्याच आरश्यातून तिनं डोळे मिटून मान खाली करत धन्यवाद पोचवलेलं पण मला समजलं. माझ्याकडून पण प्रतिक्षिप्त क्रिया झाली मान डोकावण्याची. 

काय म्हणावं याला सांगा बरं ? विना शब्द डोळ्यातून हे सगळं झाला. दोघीनी हेल्मेट घातलेलं होत. दोघीनाही कामावर पोचायचं होत. दोघीही भर रहदारीच्या कर्वे रोडवर मागे पुढे होतो. तरी संवाद झाला. धन्यवाद पण झाले. न बोलता इतकं सगळं झालं. 

मग विचार आला कि ज्यांना समजून घ्यायचाय ते कसेही घेतातच, तस करायचं तर समोरचा काय सांगतोय त्यावर ऐकून घेणं हवं.  काल परवा पर्यंत जो विचार आला होता त्यावर हळुवार फुंकर घालून दिली यांच्या मार्फत कान्हाजीनी. 

का? आणि कशी ? करा विचार तुम्हीच. 
मी मात्र जगण्याचाही कला अवगत केली. जगताना वापरता येतेय का बघु...
जय श्रीकृष्ण!
सौ. गौरी पाठक
२२.०८.२०२४